पहिल्यादांच म्युच्युअल फंड गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी - म्युच्युअल फंड गुंतवणूकीत नवे फेरबदल प्रस्तावित काय बदल होऊ शकतात वाचा...

प्रतिनिधी:सेबीने म्युच्युअल फंड नियमावलीत बदल सुचवले आहेत. प्रथमच म्युच्युअल फंडात पैसे टाकणाऱ्यांसाठी हे मोठे फेरबदल ठरू शकतात. सेबीने या प्रकियेचे प्रमाणीकरण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कुठल्याही नव्या फंडात पैसे टाकताना आता के वायसी पडताळणी करणे अनिवार्य ठरू शकते. सेबीच्या तपासात विना केवायसी फंड खातेदार आढळले होते. सेबीने याआधी म्युच्युअल फंड उद्योगात अनुसरल्या जाणाऱ्या क्रमिक प्रकियेमुळे केवायसी (Know Your Customer KYC) गैर अनुपालन (Com pliance) पोर्टफोलिओची काही उदाहरणे समोर आली आहेत असे सेबीने आपल्या निवेदनात म्हटले होते. त्यामुळे नियमावलीतील चौकट (Regulatory Framework) बदलण्याचे सेबीने ठरवले आहे. सेबीने (Security Exchange Board of India SEBI) आपल्या प्रस्ताव पत्रात म्युच्युअल फंड प्रमाणीकरणाचे ठरवले असल्याचे या निमित्ताने स्पष्ट केले.


त्यामुळे आता नव्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना प्रथम गुंतवणूक करताना केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सी (KRA) कडून प्रमाणित केवायसी पडताळणी केल्यावरच आता पुढील गुंतवणूक करता येणार आहे. सध्या साध्या केवायसीवर म्युच्युअल फंड गुंतवणुक करताना केवळ फंड हाऊसेस अवलंबून होते. आता मात्र थर्ड पार्टी एजन्सी प्रमाणीकरण निश्चित करण्यात आले आहे. याआधी सल्लागार पत्रात असे नमूद केले आहे की केवायसीशी संबंधित विलंबामुळे गुंतवणूकदार आणि एएमसी दोघांवरही परि णाम झाला आहे. चुकीच्या बँक खात्याच्या तपशीलांमुळे गुंतवणूकदारांना पुढील व्यवहारांवर तात्पुरते निर्बंध येऊ शकतात किंवा रिडेम्पशन उत्पन्न आणि लाभांश उशिरा मिळू शकतात. यामुळे विसंगती आढळल्यास फोलिओ नंतर केवायसी अनुपालन न करणारे म्हणून चिन्हांकित केले जाऊ शकतात, ज्यामुळे रिडेम्पशन, डिव्हिडंड क्रेडिट्स आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यास विलंब होऊ शकतो.


एएमसी (Asset Under Management) कंपन्याना युनिटधारकांशी संवाद साधण्यात आणि पेमेंट प्रक्रिया करण्यात अनेकदा अडचणी येतात त्यामुळे अनेकदा दावा न केलेले लाभांश प्रकियेस विलंब होऊ शकतो.नवीन प्रक्रियेमुळे चुका कमी होतील आणि अनु पालन, गुंतवणूकदारांशी संवाद आणि व्यवहाराची अचूकता सुधारेल अशी सेबीची अपेक्षा आहे. दरम्यान सध्याच्या पद्धतींच्या तुलनेत पहिल्या गुंतवणुकीची अंमलबजावणी करण्यात थोडा विलंब देखील होऊ शकतो, कारण पहिल्या व्यवहारासाठी केआरए पडता ळणीची वाट पहावी लागेल. सध्या, एएमसी-स्तरीय केवायसी तपासणीनंतर लगेचच पहिली गुंतवणूक करता येते, जी सहसा १-२ दिवसांत पूर्ण होते, तर केआरए पडताळणीसाठी कागदपत्रे आणि सिस्टम अपडेट्सवर अवलंबून अतिरिक्त २-३ कामकाजाचे दिवस लागू शकतात.सेबीने त्यांच्या वेब पोर्टलद्वारे १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मसुदा प्रक्रियेवर सार्वजनिक टिप्पण्या आमंत्रित केल्या आहेत.


एएमसी, केआरए आणि इतर बाजार मध्यस्थांना नवीन मानक लागू झाल्यानंतर त्यांचे पालन करण्यासाठी त्यांच्या अंतर्गत प्रणाली आणि कार्यप्रवाह अद्यतनित करावे लागतील.


प्रस्तावित फेरबदल असे असू शकतात -


खाते उघडण्यापूर्वी कागदपत्रे मिळवल्यानंतर तसेच अंतर्गत केवायसी पडताळणी केल्यानंतरच एएमसी नवीन पोर्टफोलिओ तयार होतील.


ती प्रकिया पूर्ण झाल्यावर कागदपत्रे अंतिम पडताळणीसाठी केआरएकडे पाठवली जाणार आहेत.


केआरए केवायसी पडताळणी पूर्ण केल्यानंतर आणि फोलिओला अनुपालन म्हणून चिन्हांकित केल्यानंतरच पहिली गुंतवणूक अंमलात आणता येईल.


गुंतवणूकदारांना प्रत्येक टप्प्यावर ईमेल आणि मोबाइल सूचनांद्वारे त्यांच्या केवायसी स्थितीची माहिती दिली जाईल असे सेबीने म्हटले.

Comments
Add Comment

कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना