दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन वर्षाच्या मुलीला आरोपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन्ही गटांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी एका गटाच्या गुन्ह्यात चिमुकलीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.




या घटनेत जखमी असलेल्या संध्या साठे यांनी सांगितले की, त्यांच्यासह अनेकांना एका गटाकडून मारहाण झाली. आमच्यापैकी जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये आमच्यासोबत असलेली एक दोन वर्षांची मुलगीदेखील होती. पोलिसांनी या दोन वर्षांच्या मुलीलाही गुन्ह्यात आरोपी केले आहे. ही बाब जेव्हा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले तेव्हा वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.



या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यापैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर तीन जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

अक्षया नाईकचं ओटीटीवर पदार्पण

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. तिच्या सोशल मीडिया

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र