फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर हादरला आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने खेळत असलेल्या मुलांवर अॅसिड फेकले. या अॅसिड हल्ल्यात ५ जण जखमी झाले असून एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.


मंगळवारी रात्री ९ वाजता १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचा एक गट गावात फटाके फोडत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुलांना फटाके फोडण्यास मनाई केली. मात्र मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने आपल्या घराच्या छतावरून अॅसिडचा डबा थेट त्यांच्या दिशेने फेकला. अॅसिड मुलांवर उडाल्याने ते भाजले आणि परिसरात क्षणात गोंधळ उडाला.


या घटनेत शेरसिंग यांचे मुलगे राहुल आणि दीपक, बहादूर यांचा मुलगा सौरभ, बालेश यांचा मुलगा पंकज, आणि लाहोरसिंग यांचा मुलगा विशाल हे जखमी झाले. तातडीने ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. चार मुलांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर सौरभ हा सुमारे ५० टक्के भाजल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले.


घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी व्यक्तीला पकडून त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस महानिरीक्षक राजीव रौथन यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, गावात तणावाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या