कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. त्यातील एक प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो १२ या मेट्रोमुळे कल्याण आणि तळोजा ही दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. मेट्रो १२ चे काम सध्या प्रगतीपथावर असून या मेट्रोमुळे नवी मुंबई शहर ठाण्याला जोडले जाणार आहे. मेट्रो १२ प्रकल्प ही ऑरेंज मार्गिका असून मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) चा विस्तारीत प्रकल्प आहे.


गेल्या वर्षीच या मेट्रोचे भूमीपूजन पार पडले होते. तर सध्या पिलर्सची उभारणी झाली आहे. भूमीपूजन झाल्यानंतर एका वर्षांतच मेट्रोचे खांब उभे केले आहेत. मुंबई मेट्रो १२ चे काम सुपरफास्ट होत आहे. मुंबई मेट्रो १२ हा प्रकल्प पूर्णपणे उन्नत असेल. या प्रकल्पाची एकूण लांबी २२.१७ किमी असेल, तर या मार्गिकेवर १९ स्थानके असणार असून, एपीएमसी कल्याण ते अमनदूत तळोजा अशी ही मार्गिका असणार आहे.

या मार्गिकेल २ इंटरचेंज असणार आहे. पहिली मुंबई मेट्रो लाइन ५ वरील कल्याण एपीएमसी. दुसरा म्हणजे नवी मुंबई मेट्रो लाइन १ वरील अमनदूत तळोजा येथे कनेक्ट होईल. या मेट्रोमुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. २०२७ पर्यंत ही मेट्रो मार्गिका सेवेत येणार आहे.



अशी असतील स्थानके


कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो आणि तळोजा.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या