कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. त्यातील एक प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो १२ या मेट्रोमुळे कल्याण आणि तळोजा ही दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. मेट्रो १२ चे काम सध्या प्रगतीपथावर असून या मेट्रोमुळे नवी मुंबई शहर ठाण्याला जोडले जाणार आहे. मेट्रो १२ प्रकल्प ही ऑरेंज मार्गिका असून मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) चा विस्तारीत प्रकल्प आहे.


गेल्या वर्षीच या मेट्रोचे भूमीपूजन पार पडले होते. तर सध्या पिलर्सची उभारणी झाली आहे. भूमीपूजन झाल्यानंतर एका वर्षांतच मेट्रोचे खांब उभे केले आहेत. मुंबई मेट्रो १२ चे काम सुपरफास्ट होत आहे. मुंबई मेट्रो १२ हा प्रकल्प पूर्णपणे उन्नत असेल. या प्रकल्पाची एकूण लांबी २२.१७ किमी असेल, तर या मार्गिकेवर १९ स्थानके असणार असून, एपीएमसी कल्याण ते अमनदूत तळोजा अशी ही मार्गिका असणार आहे.

या मार्गिकेल २ इंटरचेंज असणार आहे. पहिली मुंबई मेट्रो लाइन ५ वरील कल्याण एपीएमसी. दुसरा म्हणजे नवी मुंबई मेट्रो लाइन १ वरील अमनदूत तळोजा येथे कनेक्ट होईल. या मेट्रोमुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. २०२७ पर्यंत ही मेट्रो मार्गिका सेवेत येणार आहे.



अशी असतील स्थानके


कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो आणि तळोजा.

Comments
Add Comment

भारत युरोपियन द्विपक्षीय करारानंतर भारतीय एमएसएमई उद्योगांना २३ ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ उघडणार

प्रतिनिधी: काल झालेल्या भारत ईयु एफटीए कराराचा मोठा फायदा भारतीय बाजारपेठेत होणार आहे. अशातच याचा मोठा फायदा लघू

सासू सरपंच, सासरे शिक्षक;तरीही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

इंजिनीअर दीप्तीची गळफास घेऊन आत्महत्या पुणे : उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे राहणाऱ्या दीप्ती मगर-चौधरी (वय

घनकचरा कंत्राटदारावर २०० कोटींचा अतिरिक्त खर्च

पहिल्याच वर्षीच्या खर्चात ३५ कोटी १२ लाखांची वाढ गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनावर

ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन झाले कमी, उबाठाचे वाढले

भाजपच गड तरीही सावरु शकले नाही शिवसेनेला, विक्रोळीत वाढवली आपली अधिक ताकद सचिन धानजी मुंबई : मुंबई

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी

कडोंमपात सेना-भाजपचे सूत्र ठरले!

शिवसेनेच्या नेत्याने सर्व संभ्रम दूर केले कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीत