ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन झाले कमी, उबाठाचे वाढले

भाजपच गड तरीही सावरु शकले नाही शिवसेनेला,


विक्रोळीत वाढवली आपली अधिक ताकद


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये लढली असली तरी भाजपचा गड असलेल्या ईशान्य मुुबईत शिवसेनेची वाढलेली ताकद कमी झाली आहे. या निवडणुकीत ईशान्य मुंबईत शिवसेनेचे १२ नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता ०४वर आली आहे. तर उबाठाची संख्या ०८एवढी होती, ती वाढून ११ झाली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन कमी झाले असून उबाठाचे वजन वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून या सर्व विधानसभांमध्ये ३९ नगरसेवक आहेत. त्यातील मागील वेळेस भाजप आणि शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही संख्या १९ एवढी झाली आहे. त्यामुळे महायुतीची संख्या ०६ने कमी झाली आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या १३ होती ती आता वाढून १५ झाली आहे, तर शिवसेनेची संख्या १२ होती होती, कमी हाेवून ०४ एवढी झाली आहे. तर उबाठाची संख्या ०८ वरून ११ एवढी झाली आहे.


विशेष म्हणजे विक्रोळीत उबाठाचा जिथे एक नगरसेवक होता, तिथे आता त्यांचे ०४ नगरसेवक झाले आहेत.


तर भांडुप आणि घाटकोपर पश्चिममधील नगरसेवकांची संख्या कायमच राहिली आहे. या दोन्ही मतदार संघात मागे प्रत्येकी ३ नगरसेवक निवडून आले होते, ही संख्या आताही कायम आहे. तसेच मानखुर्द शिवाजी नगरमध्येही उबाठाचा एकमेव नगरसेवक होता, ही संख्या त्यांनी कायमच राखली आहे तर या मतदार संख्या शिवसेनेचे तीन नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता एकवर आली आहे.


उत्तर पूर्व मुंबई


पूर्वी


भाजप : १३, शिवसेना : १२, उबाठा : ०८,काँग्रेस : ०१, समाजवादी पार्टी : ०५


उत्तर पूर्व मुंबई


आता


भाजप : १५, शिवसेना : ०४, उबाठा : ११,काँग्रेस : ०१, एमआयएम व इतर ०८

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र