ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन झाले कमी, उबाठाचे वाढले

भाजपच गड तरीही सावरु शकले नाही शिवसेनेला,


विक्रोळीत वाढवली आपली अधिक ताकद


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये लढली असली तरी भाजपचा गड असलेल्या ईशान्य मुुबईत शिवसेनेची वाढलेली ताकद कमी झाली आहे. या निवडणुकीत ईशान्य मुंबईत शिवसेनेचे १२ नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता ०४वर आली आहे. तर उबाठाची संख्या ०८एवढी होती, ती वाढून ११ झाली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन कमी झाले असून उबाठाचे वजन वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून या सर्व विधानसभांमध्ये ३९ नगरसेवक आहेत. त्यातील मागील वेळेस भाजप आणि शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही संख्या १९ एवढी झाली आहे. त्यामुळे महायुतीची संख्या ०६ने कमी झाली आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या १३ होती ती आता वाढून १५ झाली आहे, तर शिवसेनेची संख्या १२ होती होती, कमी हाेवून ०४ एवढी झाली आहे. तर उबाठाची संख्या ०८ वरून ११ एवढी झाली आहे.


विशेष म्हणजे विक्रोळीत उबाठाचा जिथे एक नगरसेवक होता, तिथे आता त्यांचे ०४ नगरसेवक झाले आहेत.


तर भांडुप आणि घाटकोपर पश्चिममधील नगरसेवकांची संख्या कायमच राहिली आहे. या दोन्ही मतदार संघात मागे प्रत्येकी ३ नगरसेवक निवडून आले होते, ही संख्या आताही कायम आहे. तसेच मानखुर्द शिवाजी नगरमध्येही उबाठाचा एकमेव नगरसेवक होता, ही संख्या त्यांनी कायमच राखली आहे तर या मतदार संख्या शिवसेनेचे तीन नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता एकवर आली आहे.


उत्तर पूर्व मुंबई


पूर्वी


भाजप : १३, शिवसेना : १२, उबाठा : ०८,काँग्रेस : ०१, समाजवादी पार्टी : ०५


उत्तर पूर्व मुंबई


आता


भाजप : १५, शिवसेना : ०४, उबाठा : ११,काँग्रेस : ०१, एमआयएम व इतर ०८

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा