अ‍ॅडलेड ODI : ऑस्ट्रेलियाची आक्रमक गोलंदाजी, भारताचा निम्मा संघ तंबूत


अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला. आता अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताची स्थिती चिंताजनक अशीच आहे.


पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेडमध्येही नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. अ‍ॅडलेडमध्ये भारताने ४१.३ षटकांत पाच बाद २१२ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५९ वे अर्धशतक झळकावले. तो ९७ चेंडूत दोन षटकार आणि सात चौकार मारत ७३ धावा करुन स्टार्कच्या चेंडूवर हेझलवडकडे झेल देऊन बाद झाला. रोहितला उत्तम साथ देणारा श्रेयस अय्यर ६१ धावा करुन त्रिफळाचीत झाला. याआधी कर्णधार शुभमन गिल नऊ धावा करुन तर विराट कोहली शून्य धावा करुन तंबूत परतल्यामुळे भारतावरील दबाव वाढला. केएल राहुल ११ धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट आणि अ‍ॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन तर मिचेल स्टार्कने एक बळी घेतला.


अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर खेळत आहेत.

Comments
Add Comment

BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला बढती

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला (लेडी

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसह तळाचे फलंदाज चमकले; भारताने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले एवढे मोठे आव्हान

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला

सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झालेला विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार, सोशल मीडियात चर्चा

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अ‍ॅडलेड

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, भारताला फलंदाजीस बोलावले

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस

Video: शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याने केले नापाक कृत्य, आधी हात मिळवला आणि...

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान अ‍ॅडलेडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा

महिला विश्वचषक : सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नवी मुंबई : २०२५ महिला विश्वचषक एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत फक्त एकच स्थान