कोलकाता-श्रीनगर इंडिगो विमानात इंधन गळती, वाराणसीत आपत्कालीन लँडिंग; १६६ प्रवासी सुखरूप

वाराणसी: कोलकाता येथून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला आज बुधवारीइंधन गळतीमुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानातील सर्व १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत.


इंडिगो फ्लाईट क्रमांक 6E-6961 ही कोलकाता येथून श्रीनगरसाठी निघाली होती. विमान हवेत असतानाच वैमानिकाला विमानातील इंधन टाकीतून इंधन गळती होत असल्याचा संशय आला. वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वाराणसी येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगची मागणी केली.एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर, वैमानिकाने सायंकाळी सुमारे ४:१० वाजता विमान वाराणसी विमानतळाच्या धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले.


विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर तातडीने सर्व १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्सला विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानतळाच्या आगमन विभागात सुरक्षितपणे बसवण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.


विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची तपासणी करण्यासाठी ते 'ग्राउंड' करण्यात आले आहे आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी (श्रीनगर) पोहोचवण्यासाठी दुसऱ्या पर्यायी विमानाची व्यवस्था इंडिगो एअरलाईन्सकडून केली जात आहे.


इंडिगो एअरलाईन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, "तांत्रिक कारणामुळे विमानाने वाराणसी विमानतळावर खबरदारीचा उपाय म्हणून लँडिंग केले. आमच्या प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे."

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला