कोलकाता-श्रीनगर इंडिगो विमानात इंधन गळती, वाराणसीत आपत्कालीन लँडिंग; १६६ प्रवासी सुखरूप

वाराणसी: कोलकाता येथून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला आज बुधवारीइंधन गळतीमुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानातील सर्व १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत.


इंडिगो फ्लाईट क्रमांक 6E-6961 ही कोलकाता येथून श्रीनगरसाठी निघाली होती. विमान हवेत असतानाच वैमानिकाला विमानातील इंधन टाकीतून इंधन गळती होत असल्याचा संशय आला. वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वाराणसी येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगची मागणी केली.एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर, वैमानिकाने सायंकाळी सुमारे ४:१० वाजता विमान वाराणसी विमानतळाच्या धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले.


विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर तातडीने सर्व १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्सला विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानतळाच्या आगमन विभागात सुरक्षितपणे बसवण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.


विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची तपासणी करण्यासाठी ते 'ग्राउंड' करण्यात आले आहे आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी (श्रीनगर) पोहोचवण्यासाठी दुसऱ्या पर्यायी विमानाची व्यवस्था इंडिगो एअरलाईन्सकडून केली जात आहे.


इंडिगो एअरलाईन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, "तांत्रिक कारणामुळे विमानाने वाराणसी विमानतळावर खबरदारीचा उपाय म्हणून लँडिंग केले. आमच्या प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे."

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात