खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि धक्कादायक घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर हे राहत असलेल्या एका गगनचुंबी इमारतीच्या २२ व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दिवाळीत उडवलेल्या 'रॉकेट' फटाक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.



आग विझवण्यासाठी गेले तर फायर सिस्टीममध्ये पाणीच नव्हते!


ही दुर्घटना घडताच खासदार वायकर यांनी स्वतः तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी मदतकार्य सुरू केले. मात्र, याच वेळी त्यांना इमारतीच्या अग्निशमन प्रणालीत (Fire System) पाणीच उपलब्ध नसल्याचे समजले. या मोठ्या त्रुटीमुळे वायकर यांनी घटनास्थळीच तीव्र संताप व्यक्त केला.


या घटनेनंतर रवींद्र वायकर यांनी थेट मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. "जर नव्याने बांधलेल्या इमारतींची फायर सिस्टीमच काम करत नसेल, तर मुंबईतील जुन्या इमारतींची अवस्था काय असेल?" असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.


त्यांनी मुंबईतील प्रत्येक इमारतीच्या फायर सिस्टीमची कसून तपासणी करण्याची आणि त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.



घातक फटाक्यांवर बंदीसाठी लोकसभेत मुद्दा मांडणार


यावर्षी दिवाळीत मुंबईत रॉकेट फटाक्यांमुळे उंच इमारतींना धोका निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र वायकर यांनी रॉकेटसारख्या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी लोकसभेत मुद्दा मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


त्यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे की, रॉकेटसारखे फटाके इमारतींच्या दिशेने सोडू नका आणि आपली दिवाळी शांततेत तसेच सुरक्षितपणे साजरी करा.

Comments
Add Comment

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या