राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट मिळाली आहे. अतिदुर्गम भागातील बार्शीमाळ गावामधील उमरटकर वस्ती व बालवड गावातील मोरे वस्तीत वीज जोडणी नव्हती. त्यामुळे ऐन दिवाळी अंधारात साजरी करणाऱ्या उमराटकर-मोरे वस्तीतील स्थानिकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.


महावितरणाच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांचा वीज जोडणीचा प्रश्न कित्येक वर्षांनी सुटला आहे. वस्तीतील नागरिकांनी घरात वीज मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केला होता. मंजुरीकरिता अंदाजपत्रक मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता बैकर यांच्याकडे वेल्हा शाखा कार्यालयामधून शाखा अभियंता सचिन कुलकर्णी यांनी पाठविले. त्यावर कार्यकारी अभियंता बैकर यांनी वास्तव्य जाणून घेत अंदाजपत्रक तात्काळ मंजूर करून कामास सुरूवात केली.


महावितरणने अवघ्या ४८ तासांत काम पूर्ण करून सर्व घरांना वीज मीटर बसवले. त्यामुळे या भागातील सर्व घरे प्रकाशमय झाली आहेत. त्यामुळे यावर्षीची नागरिकांची दिवाळी प्रकाशात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी कुलकर्णी, थोरवे मॅडम, सोनसळे, आग्रवाल ठेकेदार व मुळशी विभागचे कार्यकारी अभियंता बैक यांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा