दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी


फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही पारा वाढून 'अतिशय खराब' श्रेणीत; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर


नवी दिल्ली/मुंबई: दिवाळीच्या रात्री झालेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे दिल्ली आणि मुंबई दोन्ही महानगरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना श्वास घेण्यास अडचण येत आहे.

दिल्लीचा श्वास कोंडला, AQI ४०० पार


दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) हवेची गुणवत्ता 'अतिशय खराब' ते 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. आज, मंगळवारी सकाळी दिल्लीचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) ४०० च्या वर नोंदवण्यात आला. अनेक भागांमध्ये हा निर्देशांक ४२० पर्यंत गेला, जो थेट 'गंभीर' श्रेणीत मोडतो.

परिणामी, दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत विषारी झाली असून, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. शांत हवामान आणि फटाक्यांचा धूर एकत्र आल्याने प्रदूषणाचे कण हवेत तसेच साचून राहिले आहेत.

मुंबईकरांचेही आरोग्य धोक्यात


दिल्लीप्रमाणेच आर्थिक राजधानी मुंबईची हवाही अत्यंत खालावली आहे. दिवाळीनंतर मुंबईच्या अनेक भागांमध्ये AQI 'अतिशय खराब' श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.

आज, मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांत AQI मध्ये मोठी वाढ झाली असून, कुलाबा येथील वेधशाळेजवळ AQI ३४१ पर्यंत नोंदवला गेला. तसेच, वांद्रे, माझगाव आणि चेंबूर यांसारख्या भागांमध्येही निर्देशांक ३०० च्या आसपास किंवा त्याहून अधिक होता. मान्सून माघारी गेल्यानंतर मुंबईमध्ये यंदा प्रथमच इतका उच्च AQI नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

AQI नुसार हवेच्या गुणवत्तेची श्रेणी:


०-५०: चांगली (Good)


५१-१००: समाधानकारक (Satisfactory)


१०१-२००: मध्यम (Moderate)


२०१-३००: खराब (Poor)


३०१-४००: अतिशय खराब (Very Poor)


४०१-५००: गंभीर (Severe)


दरम्यान, आणखी दोन दिवस दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यात येणार असल्याने प्रदूषणाची पातळी वाढतच रहाणार आहे. त्यामुळे, दिल्ली आणि मुंबईतील श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या नागरिकांना घरात राहण्याचा आणि अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या