संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप


संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली असून हे दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.


दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लक्ष्मीपूजन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात यांचा हे पक्षातील सर्वात सिनियर नेत्यांपैकी एक नेते आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ते बडे प्रस्थ आहेत. त्याशिवाय बाळासाहेब थोरात यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. एक दिग्गज राजकारणी म्हणून त्यांची छवी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जाते.


बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्ष संगमनेरचे प्रतिनिधित्व केले. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. हा पराभव अनेकांना धक्का देणारा होता.


यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, संगमनेर मतदारसंघात साडे नऊ हजार दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही. आम्हाला तहसीलदरांनी उत्तर दिले आहे की, असे कोणतंही नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही.


एका बाजूला तुम्ही सांगता की, आम्ही आदेश दिला आहे. चुका दुरुस्त करणार आहोत. दुसऱ्या बाजूला सांगताय की, आम्हाला अधिकारच नाही. असा हा बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि हे अधिकारी करत आहेत का? ही शंका यावी अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

Comments
Add Comment

Babasaheb Patil : ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना उद्या कर्जमाफीचा लाभ मिळणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेधारकांची यादी जाहीर होणार मुंबई (Mumbai):

Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना १० लाखांची आर्थिक मदत

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत (Moshi Garbage Depot Accident) मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या

बिबट्याच्या दहशतीचा अखेर अंत! ११ बकऱ्या, एका वासराचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला

PMFBY : महाराष्ट्रात सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून,

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून

Heart-wrenching incident in Nagpur : शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळल्याने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नागपूर: नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना