‘केबीसी’मधील वागण्यावर इशित भट्टने मागितली माफी: ट्रोलिंगनंतर व्यक्त केला पश्चाताप

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय गेम शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शोदरम्यान त्याच्या वागणुकीवर प्रेक्षकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आणि त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. अखेर इशितने एक व्हिडिओ शेअर करून आपल्या कृतीबद्दल माफी मागितली आहे.


शोदरम्यान इशितचं वर्तन काही प्रेक्षकांना उद्धट वाटलं जेव्हा तो अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधत होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. ओव्हरकॉन्फिडन्समुळे इशितला कोणतीही रक्कम न जिंकता स्पर्धेबाहेर पडावं लागलं. या संपूर्ण प्रकरणानंतर इशितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली.



शो प्रसारित झाल्यानंतर इशितच्या वागण्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्याचं वागणं उद्धट असल्याचं म्हटलं, तर काहींनी त्याच्या लहान वयाचा विचार करून सहानुभूती दाखवली. यानंतर इशितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत स्पष्ट स्पष्टीकरण दिलं.


त्याने व्हिडिओसोबत लिहिलं, “सर्वांना नमस्कार. KBC मधील माझ्या वागणुकीमुळे जर कोणी दुखावले असेल, तर मी त्याची मनापासून माफी मागतो. त्या क्षणी मी खूप घाबरलो होतो. मला उद्धटपणे वागायचं नव्हतं. माझं वर्तन चुकीचं होतं, हे आता मला समजलं आहे. मी अमिताभ सर आणि संपूर्ण टीमचा मनापासून आदर करतो.”


या प्रसंगातून स्वतःला बरेच शिकायला मिळालं असल्याचं इशितने म्हटलं. तो पुढे म्हणतो, “आपल्या शब्दांमुळे आणि वर्तनामुळे आपण कोण आहोत, हे दिसून येतं. आता मी अधिक नम्र आणि विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करेन.”


इशितच्या माफी मागण्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया संमिश्र राहिली आहे. काहींनी त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी पुन्हा एकदा त्याच्या शोमधील वर्तनावर टीका केली. मात्र लहान वयात चूक मान्य करून माफी मागणं ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे.

Comments
Add Comment

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत

Mumbai Accident : वर्सोवा-जुहू लिंक रोडवर भीषण अपघात; भरधाव बसने अनेक गाड्यांना दिली धडक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर