‘केबीसी’मधील वागण्यावर इशित भट्टने मागितली माफी: ट्रोलिंगनंतर व्यक्त केला पश्चाताप

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय गेम शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शोदरम्यान त्याच्या वागणुकीवर प्रेक्षकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आणि त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. अखेर इशितने एक व्हिडिओ शेअर करून आपल्या कृतीबद्दल माफी मागितली आहे.


शोदरम्यान इशितचं वर्तन काही प्रेक्षकांना उद्धट वाटलं जेव्हा तो अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधत होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. ओव्हरकॉन्फिडन्समुळे इशितला कोणतीही रक्कम न जिंकता स्पर्धेबाहेर पडावं लागलं. या संपूर्ण प्रकरणानंतर इशितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली.



शो प्रसारित झाल्यानंतर इशितच्या वागण्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्याचं वागणं उद्धट असल्याचं म्हटलं, तर काहींनी त्याच्या लहान वयाचा विचार करून सहानुभूती दाखवली. यानंतर इशितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत स्पष्ट स्पष्टीकरण दिलं.


त्याने व्हिडिओसोबत लिहिलं, “सर्वांना नमस्कार. KBC मधील माझ्या वागणुकीमुळे जर कोणी दुखावले असेल, तर मी त्याची मनापासून माफी मागतो. त्या क्षणी मी खूप घाबरलो होतो. मला उद्धटपणे वागायचं नव्हतं. माझं वर्तन चुकीचं होतं, हे आता मला समजलं आहे. मी अमिताभ सर आणि संपूर्ण टीमचा मनापासून आदर करतो.”


या प्रसंगातून स्वतःला बरेच शिकायला मिळालं असल्याचं इशितने म्हटलं. तो पुढे म्हणतो, “आपल्या शब्दांमुळे आणि वर्तनामुळे आपण कोण आहोत, हे दिसून येतं. आता मी अधिक नम्र आणि विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करेन.”


इशितच्या माफी मागण्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया संमिश्र राहिली आहे. काहींनी त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी पुन्हा एकदा त्याच्या शोमधील वर्तनावर टीका केली. मात्र लहान वयात चूक मान्य करून माफी मागणं ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या