‘केबीसी’मधील वागण्यावर इशित भट्टने मागितली माफी: ट्रोलिंगनंतर व्यक्त केला पश्चाताप

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय गेम शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शोदरम्यान त्याच्या वागणुकीवर प्रेक्षकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आणि त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. अखेर इशितने एक व्हिडिओ शेअर करून आपल्या कृतीबद्दल माफी मागितली आहे.


शोदरम्यान इशितचं वर्तन काही प्रेक्षकांना उद्धट वाटलं जेव्हा तो अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधत होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. ओव्हरकॉन्फिडन्समुळे इशितला कोणतीही रक्कम न जिंकता स्पर्धेबाहेर पडावं लागलं. या संपूर्ण प्रकरणानंतर इशितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली.



शो प्रसारित झाल्यानंतर इशितच्या वागण्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्याचं वागणं उद्धट असल्याचं म्हटलं, तर काहींनी त्याच्या लहान वयाचा विचार करून सहानुभूती दाखवली. यानंतर इशितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत स्पष्ट स्पष्टीकरण दिलं.


त्याने व्हिडिओसोबत लिहिलं, “सर्वांना नमस्कार. KBC मधील माझ्या वागणुकीमुळे जर कोणी दुखावले असेल, तर मी त्याची मनापासून माफी मागतो. त्या क्षणी मी खूप घाबरलो होतो. मला उद्धटपणे वागायचं नव्हतं. माझं वर्तन चुकीचं होतं, हे आता मला समजलं आहे. मी अमिताभ सर आणि संपूर्ण टीमचा मनापासून आदर करतो.”


या प्रसंगातून स्वतःला बरेच शिकायला मिळालं असल्याचं इशितने म्हटलं. तो पुढे म्हणतो, “आपल्या शब्दांमुळे आणि वर्तनामुळे आपण कोण आहोत, हे दिसून येतं. आता मी अधिक नम्र आणि विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करेन.”


इशितच्या माफी मागण्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया संमिश्र राहिली आहे. काहींनी त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी पुन्हा एकदा त्याच्या शोमधील वर्तनावर टीका केली. मात्र लहान वयात चूक मान्य करून माफी मागणं ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी