मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : “जर आमच्या मुलीने बिगर हिंदूच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. कारण जे लोक कर्मकांड पाळत नाहीत, जे शब्द पाळत नाहीत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे,” असे विधान माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुलींचे संगोपन आणि 'लव्ह जिहाद'बद्दल बोलताना केले आहे. यामुळे राजकीय, सामाजिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे.


प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, ‘जर एखादी मुलगी तिच्या पालकांचे ऐकत नसेल आणि दुसऱ्या धर्माच्या पुरुषाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर कुटुंबाने तिला थांबवण्यासाठी आणि तिला योग्य मार्गावर परत आणण्यासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे.’ पुढे साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “जर गरज पडली तर तिचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी तिला फटकारून दाखवा. जर एखादी मुलगी ऐकण्यास नकार देत असेल तर तिचे पाय तोडून टाका. जर तुम्हाला तिच्या भविष्यासाठी तिला मारहाण करावी लागली तर मागे हटू नका.”


“जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा ती अनेकदा स्वतःचा मार्ग निवडू लागते आणि कधीकधी घरातून पळून जाण्याचा प्रयत्नही करते. अशा परिस्थितीत, कुटुंबाने सतर्क राहून मुलगी योग्य मार्गावर राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. जर तिला पटवून देण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या तर मागे हटू नका.” अशी टिप्पणीही ठाकूर यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक टीकाकारांनी याला महिलांच्या हक्कांचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अवमान म्हटले आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात