५०००० कोटींहून अधिक देशात झालेली परदेशी गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेवील विश्वास दर्शवते - पियुष गोयल

प्रतिनिधी:देशातील थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) झालेली वाढ ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढते आकर्षण दर्शवते असे विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी अधोरेखित केले की जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये गोयल म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांतच, जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५ ०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत.' गोयल म्हणाले की, जागतिक अडचणींमध्ये, भारत गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.


ते यापुढे म्हणाले आहेत की, अशांत काळातही भारत एक पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे, कारण देशात थेट परकीय गुंतवणूकीचा प्रवाह जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या दूरदर्शी सुधारणा आणि वित्तीय आणि बँकिंग परिसंस्थेसाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा मजबूत प्रवाह चालत आहे.'गेल्या काही महिन्यांतच, प्रमुख गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात जोरदार रस दाखवला आहे आणि ५०००० कोटी रुपयांपेक्षा जा स्त किमतीच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे, असे पियुष गोयल यांनी नमूद केले आहे.


थेट परकीय गुंतवणुकीतील ही वाढ केवळ भारताच्या आर्थिक क्षमतेवरील वाढत्या जागतिक विश्वासाचेच प्रतीक नाही तर विकित भारत २०४७ च्या दृष्टिकोनातून देशाची प्रगती देखील मजबूत करते असे त्यांनी स्पष्ट केले. गोयल यांच्या मते, भारताची धोरणात्मक स्थिरता, सुधारणा-केंद्रित प्रशासन आणि मजबूत आर्थिक पायाभूत सुविधा यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी हे सर्वात आकर्षक ठिकाण बनले आहे.


तत्पूर्वी, मंत्री गोयल यांनी शनिवारी असा विश्वास व्यक्त केला होता की जागतिक व्यापारातील अनिश्चितता असूनही भारत या आर्थिक वर्षात निर्यातीत सकारात्मक वाढ पाहेल. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दर सुसूत्रीकरणाच्या परिणामांवरील राष्ट्रीय राजधा नीत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले आहेत की या सर्व अनिश्चितता असूनही, निर्यात एकूण ६% किंवा ७% वाढली आहे, आणि व्यापारातही, आम्ही पहिल्या सहा महिन्यांत भारताची चांगली कहाणी पाहिली आहे.जगभरात लवचिकता आहे, आत्मविश्वास आहे, आपल्या वस्तू आणि सेवांना मागणी आहे आणि भारत या वाढीच्या मार्गावर पुढे जाईल' असे ते म्हणाले.


१५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये भारताची व्यापारी निर्यात ६.७५% वाढून ३६.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आधारावर ३४.०८ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. तथा पि, आकडेवारीनुसार, व्यापारी आयात १६.७% वाढून ६८.५३ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर ५८.७४ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या

CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा

Pritam Chakraborty : प्रसिध्द संगीतकारचा 'त्या' पोस्टने चाहत्यांमध्ये खळबळ; निवृत्तीची चर्चा रंगली

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती (Music composer Pritam Chakraborty) यांनी १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त सोशल

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा ही केवळ शिक्षण