५०००० कोटींहून अधिक देशात झालेली परदेशी गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेवील विश्वास दर्शवते - पियुष गोयल

प्रतिनिधी:देशातील थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) झालेली वाढ ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढते आकर्षण दर्शवते असे विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी अधोरेखित केले की जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये गोयल म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांतच, जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५ ०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत.' गोयल म्हणाले की, जागतिक अडचणींमध्ये, भारत गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.


ते यापुढे म्हणाले आहेत की, अशांत काळातही भारत एक पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे, कारण देशात थेट परकीय गुंतवणूकीचा प्रवाह जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या दूरदर्शी सुधारणा आणि वित्तीय आणि बँकिंग परिसंस्थेसाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा मजबूत प्रवाह चालत आहे.'गेल्या काही महिन्यांतच, प्रमुख गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात जोरदार रस दाखवला आहे आणि ५०००० कोटी रुपयांपेक्षा जा स्त किमतीच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे, असे पियुष गोयल यांनी नमूद केले आहे.


थेट परकीय गुंतवणुकीतील ही वाढ केवळ भारताच्या आर्थिक क्षमतेवरील वाढत्या जागतिक विश्वासाचेच प्रतीक नाही तर विकित भारत २०४७ च्या दृष्टिकोनातून देशाची प्रगती देखील मजबूत करते असे त्यांनी स्पष्ट केले. गोयल यांच्या मते, भारताची धोरणात्मक स्थिरता, सुधारणा-केंद्रित प्रशासन आणि मजबूत आर्थिक पायाभूत सुविधा यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी हे सर्वात आकर्षक ठिकाण बनले आहे.


तत्पूर्वी, मंत्री गोयल यांनी शनिवारी असा विश्वास व्यक्त केला होता की जागतिक व्यापारातील अनिश्चितता असूनही भारत या आर्थिक वर्षात निर्यातीत सकारात्मक वाढ पाहेल. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दर सुसूत्रीकरणाच्या परिणामांवरील राष्ट्रीय राजधा नीत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले आहेत की या सर्व अनिश्चितता असूनही, निर्यात एकूण ६% किंवा ७% वाढली आहे, आणि व्यापारातही, आम्ही पहिल्या सहा महिन्यांत भारताची चांगली कहाणी पाहिली आहे.जगभरात लवचिकता आहे, आत्मविश्वास आहे, आपल्या वस्तू आणि सेवांना मागणी आहे आणि भारत या वाढीच्या मार्गावर पुढे जाईल' असे ते म्हणाले.


१५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये भारताची व्यापारी निर्यात ६.७५% वाढून ३६.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आधारावर ३४.०८ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. तथा पि, आकडेवारीनुसार, व्यापारी आयात १६.७% वाढून ६८.५३ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर ५८.७४ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.

Comments
Add Comment

'संजय राऊत यांची ही तर गिधाडी वृत्ती..'; भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत हे गिधाडी वृत्तीचे आहेत, अशा शब्दांमधून भाजप प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत

Union Budget 2026 : १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प! काय स्वस्त, काय महाग? बजेट मध्ये यंदा काय खास? सुट्टीच्या दिवशी इथे LIVE पहा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' येत्या रविवारी, १

Maharashtra Goverment On Government Aircraft And Helicopters : राज्य सरकारचा मोठा निर्णय: सरकारी विमानांच्या देखभालीचा 'प्लॅन' तयार; 'जीआर' मध्ये काय?

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांसाठी मोठा निधी

Vadhavan Airport : मुंबईचे तिसरे विमानतळ आता समुद्रात? बुलेट ट्रेन, मेट्रो आणि एक्सप्रेसवेची थेट एन्ट्री; वाढवणं बंदराशी थेट जोडणी, नक्की कुठे होणार?

पालघर : दळणवळण क्षेत्रात भारत आता एक मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. देशातील पहिले 'समुद्रातील विमानतळ' (Sea Airport) मुंबई

Canada America Conflict : कॅनडा-अमेरिका वाद शिगेला; कॅनेडियन विमानांवर ५०% कर लादण्याची ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे.  यावेळी त्यांनी

अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासंतुलन आणि मंत्रिमंडळातील खात्यांच्या