५०००० कोटींहून अधिक देशात झालेली परदेशी गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेवील विश्वास दर्शवते - पियुष गोयल

प्रतिनिधी:देशातील थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) झालेली वाढ ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढते आकर्षण दर्शवते असे विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी अधोरेखित केले की जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये गोयल म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांतच, जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५ ०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत.' गोयल म्हणाले की, जागतिक अडचणींमध्ये, भारत गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.


ते यापुढे म्हणाले आहेत की, अशांत काळातही भारत एक पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे, कारण देशात थेट परकीय गुंतवणूकीचा प्रवाह जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या दूरदर्शी सुधारणा आणि वित्तीय आणि बँकिंग परिसंस्थेसाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा मजबूत प्रवाह चालत आहे.'गेल्या काही महिन्यांतच, प्रमुख गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात जोरदार रस दाखवला आहे आणि ५०००० कोटी रुपयांपेक्षा जा स्त किमतीच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे, असे पियुष गोयल यांनी नमूद केले आहे.


थेट परकीय गुंतवणुकीतील ही वाढ केवळ भारताच्या आर्थिक क्षमतेवरील वाढत्या जागतिक विश्वासाचेच प्रतीक नाही तर विकित भारत २०४७ च्या दृष्टिकोनातून देशाची प्रगती देखील मजबूत करते असे त्यांनी स्पष्ट केले. गोयल यांच्या मते, भारताची धोरणात्मक स्थिरता, सुधारणा-केंद्रित प्रशासन आणि मजबूत आर्थिक पायाभूत सुविधा यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी हे सर्वात आकर्षक ठिकाण बनले आहे.


तत्पूर्वी, मंत्री गोयल यांनी शनिवारी असा विश्वास व्यक्त केला होता की जागतिक व्यापारातील अनिश्चितता असूनही भारत या आर्थिक वर्षात निर्यातीत सकारात्मक वाढ पाहेल. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दर सुसूत्रीकरणाच्या परिणामांवरील राष्ट्रीय राजधा नीत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले आहेत की या सर्व अनिश्चितता असूनही, निर्यात एकूण ६% किंवा ७% वाढली आहे, आणि व्यापारातही, आम्ही पहिल्या सहा महिन्यांत भारताची चांगली कहाणी पाहिली आहे.जगभरात लवचिकता आहे, आत्मविश्वास आहे, आपल्या वस्तू आणि सेवांना मागणी आहे आणि भारत या वाढीच्या मार्गावर पुढे जाईल' असे ते म्हणाले.


१५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये भारताची व्यापारी निर्यात ६.७५% वाढून ३६.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आधारावर ३४.०८ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. तथा पि, आकडेवारीनुसार, व्यापारी आयात १६.७% वाढून ६८.५३ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर ५८.७४ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.

Comments
Add Comment

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी

गुगलकडून व्यक्ती सुरक्षेसाठी सर्वात मोठे ईएलएस फिचर लाँच आता केवळ ११२ नंतर दाबा पुढे....

मोहित सोमण: तुमच्या आयुष्यात खूप कधी कधी संकट येते मात्र तांत्रिक सुरक्षेची वानवा असल्याने अनेकदा व्यक्तींना

निफ्टी एक्सपायरी पार्श्वभूमीवर 'व्यापक' शेअर बाजार विश्लेषण: तज्ञांच्या मते, बाजार मजबूत तरीही का कोसळला? वाचा सविस्तर

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ घसरणीसह सेन्सेक्स ४२.६४ अंकाने

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

'मामूंची टोळी एकत्र आल्याने भाजपला काही फरक पडत नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा मंगळवारी होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालसाणे णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मान्यता

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मियांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख