दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगावशेरी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


संतोष कुसाळ (४५, रा. गणेशनगर) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वडगावशेरी येथील एका तरुण मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. काल दिवसभर त्यांनी मंडळातील इतर सदस्यांसह किल्ला बांधण्याचे काम केले.


रात्री मोठा आकाश कंदील रस्त्यावर लावण्यासाठी ते झाडावर चढले होते. दोरी बांधताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passes Away : आता दादांना नेतोय पण..." पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेताना जय पवारांना अश्रू अनावर!

बारामती : बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच

हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर गुरुवारी बारामतीत होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी

CM Fadnavis Dy CM Eknath Shinde Meet Sunetra Pawar in Baramati : सुनेत्रा वहिनींनी जोडलेले हात अन् मुख्यमंत्री-राज्यपालांची स्तब्धता; बारामतीतील ते दृश्य पाहून महाराष्ट्र हळहळला

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रूबाबदार आणि 'दादा' नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानातील 'ती' क्रू-मेंबर; बाबा, दादांशी तुमचं बोलणं करून देईन..पिंकीचा तो शब्द शेवटचाच ठरला!

बारामती : संपूर्ण महाराष्ट्र आज एका अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणाऱ्या बातमीने जागा झाला. बारामतीमध्ये

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांवर उद्या बारामतीत अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी येणार!

बारामती : २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. राज्याचे