अ‍ॅटलीच्या आगामी सिनेमात दिसणार दीपिका आणि अल्लू अर्जुन... यावर काय म्हणाला रणवीर सिंह

मुंबई : जवान फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत दीपिका यामध्ये जबरदस्त ऍक्शन सीन्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसच दीपिका आणि अल्लू अर्जुन ही नवीन जोडी पहिल्यांदाच पदड्यावर झळकणार आहे. अल्लू अर्जुन हा साऊथचा सुपरस्टार आणि दीपिका ही बॉलीवूडची सुपरस्टार आणि तितकाच मोठा त्यांचा फॅनबेस सुद्धा आहे. त्यामुळे यांच्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.


रणवीर सिंग ने नुकतीच या सिनेमाच्या सेटला भेट दिली. दीपिकाच्या या चित्रपटविषयी बोलताना रणवीर म्हणाला ," मी अ‍ॅटलीच्या सेटवर गेलो होतो, दीपिकाचा शूट तिथे सुरु होतं. सिनेमाची स्केलच अशी आहे कि या आधी आपण कधीच पहिली नसेल, न भूतो न भविष्यती असा हा सिनेमा असणार आहे. मी बऱ्याच काळापासून अटली चा चाहता आहे. जवानच्या यशाआधी मी त्याचा " मर्सल " सिनेमा बघून प्रभावित झालो.


यावेळी त्याने बॉबी देओल आणि श्रीलीलाचेही कौतुक केले. श्रीलीला तर नॅशनल क्रश आहे. तिच्या आगामी सिनेमांबाबदल मला उत्सुकता आहे. ती मोठी स्टार बनेल. असे तो म्हणाला


रणवीर सिंग हा आगामी धुरंधर सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचे फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सोबत तगडी स्टारकास्ट आहे. संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, असे दिग्गज कलाकार आहेत, ५ डिसेंबर २०२५ रोजी सिनेमा भेटीला येत आहे.

Comments
Add Comment

दिवाळीच्या आधी परिणितीने दिली गुड न्यूज , परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा झाले आईबाबा...

चड्डा घराण्यात चिमुकल्याचा आगमन झालं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डाने दिली गुड न्युज. परिणीती आणि राघव यांनी

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्री मधल्या उषा नाडकर्णी बरेचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी

२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या

'ठरलं तर मग' मालिकेत आजीची भूमिका साकारणार रोहिणी हट्टंगडी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.