दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आज (१९ ऑक्टोबर) दिवाळीच्या तिसऱ्या दिवशीही मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एग्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत आहे.


१७ आणि १८ ऑक्टोबरलाही दिवसभर या भागात वाहनांचा मोठा ताण होता. आज तर खोपोली एग्झिटपासून खंडाळा घाटापर्यंत वाहनांची सुमारे तीन ते चार किलोमीटर लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच वाहनांची वाढलेली संख्या आणि काही चालकांकडून लेन शिस्त न पाळल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ओव्हरटेकची स्पर्धा आणि वेगमर्यादा न पाळल्यानेही वाहतूक कोंडी अधिक वाढली आहे.


खंडाळा महामार्ग वाहतूक पोलीस सतत ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांचा ओघ एवढा मोठा असल्याने कोंडी कमी होताना दिसत नाही. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना तासन् तास वाहनांमध्ये अडकून राहावे लागत आहे.



प्रवाशांचा संताप...


वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा संताप उफाळून आला असून, सणासुदीच्या काळात प्रशासनाने आधीच योग्य नियोजन का केलं नाही? असा सवाल नागरिक करत आहेत. दिवसा मोठ्या वाहनांना बंदी असतानाही अनेक जड वाहनं एक्सप्रेस वेवर धावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, वाहनचालक, पर्यटक आणि प्रवासी या सर्वांनाच दिवाळीच्या उंबरठ्यावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

मुंब्रा,कुर्ल्यात ATS छापे; 'अल्-कायदा' लिंकचा संशय!

मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संशयित मूलतत्त्ववादी गतिविधींच्या चौकशीचा भाग म्हणून बुधवारी मुंब्रा

गोविंदाला 'चक्कर'! व्यायामामुळे थकवा, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलेल्या मुंबईतील क्रिटीकेअर

कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग

मुंबई : कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल.बी.एस रोड वरील शीतल टॉकीज जवळच्या हॉटेल सन लाईटमधील तळमजल्यावर भीषण आग लागली.

लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत