दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आज (१९ ऑक्टोबर) दिवाळीच्या तिसऱ्या दिवशीही मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एग्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत आहे.


१७ आणि १८ ऑक्टोबरलाही दिवसभर या भागात वाहनांचा मोठा ताण होता. आज तर खोपोली एग्झिटपासून खंडाळा घाटापर्यंत वाहनांची सुमारे तीन ते चार किलोमीटर लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच वाहनांची वाढलेली संख्या आणि काही चालकांकडून लेन शिस्त न पाळल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ओव्हरटेकची स्पर्धा आणि वेगमर्यादा न पाळल्यानेही वाहतूक कोंडी अधिक वाढली आहे.


खंडाळा महामार्ग वाहतूक पोलीस सतत ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांचा ओघ एवढा मोठा असल्याने कोंडी कमी होताना दिसत नाही. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना तासन् तास वाहनांमध्ये अडकून राहावे लागत आहे.



प्रवाशांचा संताप...


वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा संताप उफाळून आला असून, सणासुदीच्या काळात प्रशासनाने आधीच योग्य नियोजन का केलं नाही? असा सवाल नागरिक करत आहेत. दिवसा मोठ्या वाहनांना बंदी असतानाही अनेक जड वाहनं एक्सप्रेस वेवर धावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, वाहनचालक, पर्यटक आणि प्रवासी या सर्वांनाच दिवाळीच्या उंबरठ्यावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

Anil Ambani ED Case | अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे