सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३०३ कोटी इतका खर्च येणार असून . या पुलामुळे दोन फायदे होतील पुलामुळे वाहतूक कोंडीही दूर होईल. मिठी नदीचा प्रवाह सुद्धा सुरळीत होईल. असा दावा महापालिकेने केला आहे.


२००५ च्या अतिवृष्टीनंतर डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मिठी नदीचे पात्र सध्याच्या ६८ मीटरवरुन १०० मीटर पर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच शीव - धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रेला जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी करून रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. आणि ही कामं दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.


वांद्रे पूर्व येथील ड्राईव्ह इन थिएटर जवळून मिठी नदी वाहते. आणि या मिठी नदीवरून जाणाऱ्या पुलावरून वाहनांची गर्दी वाढली आहे. सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी, आणि कलिना येथे जाण्यासाठी धारावी येथील पूल महत्वाचा मानला जातो. पुलाची रुंदी कमी असल्याने प्रवाश्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात मिठी नदी तुडुंब वाहू लागते त्यामुळे पुलाची रुंदी आणि उंचीही कमी असल्याने पाण्याच्या प्रवासातही अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.


आणखी एका पुलाची उभारणी


जुना पूल पाडल्यावर नवीन भक्कम पूल बांधेपर्यंत त्याला पर्याय म्हणून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पुलाच्या बाजूलाच एक तात्पुरता पूल बांधण्यात येणार आहे

Comments
Add Comment

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील

अश्विनी भिडेंनी BMC आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते

राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी

'Dunagiri' Warship : स्वदेशी ‘स्टेल्थ फ्रिगेट’ तंत्रज्ञानाने बांधणी केलेली ‘दुनागिरी’ युध्दनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेला मोठी चालना मुंबई : गार्डन रीच शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स लिमिटेड

मुंबईत वीज दरात कपात; एप्रिल २०२६ पासून ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पावर आणि अदानी

नवीन आयकर कायदा आणि अनेक अर्थसंकल्पीय तरतुदी १ एप्रिलपासून होणार लागू

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीबरोबरच, देशाच्या आयकर रचनेतही १ एप्रिलपासून मोठे बदल होणार