सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३०३ कोटी इतका खर्च येणार असून . या पुलामुळे दोन फायदे होतील पुलामुळे वाहतूक कोंडीही दूर होईल. मिठी नदीचा प्रवाह सुद्धा सुरळीत होईल. असा दावा महापालिकेने केला आहे.


२००५ च्या अतिवृष्टीनंतर डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मिठी नदीचे पात्र सध्याच्या ६८ मीटरवरुन १०० मीटर पर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच शीव - धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रेला जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी करून रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. आणि ही कामं दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.


वांद्रे पूर्व येथील ड्राईव्ह इन थिएटर जवळून मिठी नदी वाहते. आणि या मिठी नदीवरून जाणाऱ्या पुलावरून वाहनांची गर्दी वाढली आहे. सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी, आणि कलिना येथे जाण्यासाठी धारावी येथील पूल महत्वाचा मानला जातो. पुलाची रुंदी कमी असल्याने प्रवाश्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात मिठी नदी तुडुंब वाहू लागते त्यामुळे पुलाची रुंदी आणि उंचीही कमी असल्याने पाण्याच्या प्रवासातही अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.


आणखी एका पुलाची उभारणी


जुना पूल पाडल्यावर नवीन भक्कम पूल बांधेपर्यंत त्याला पर्याय म्हणून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पुलाच्या बाजूलाच एक तात्पुरता पूल बांधण्यात येणार आहे

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व