सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३०३ कोटी इतका खर्च येणार असून . या पुलामुळे दोन फायदे होतील पुलामुळे वाहतूक कोंडीही दूर होईल. मिठी नदीचा प्रवाह सुद्धा सुरळीत होईल. असा दावा महापालिकेने केला आहे.


२००५ च्या अतिवृष्टीनंतर डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मिठी नदीचे पात्र सध्याच्या ६८ मीटरवरुन १०० मीटर पर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच शीव - धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रेला जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी करून रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. आणि ही कामं दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.


वांद्रे पूर्व येथील ड्राईव्ह इन थिएटर जवळून मिठी नदी वाहते. आणि या मिठी नदीवरून जाणाऱ्या पुलावरून वाहनांची गर्दी वाढली आहे. सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी, आणि कलिना येथे जाण्यासाठी धारावी येथील पूल महत्वाचा मानला जातो. पुलाची रुंदी कमी असल्याने प्रवाश्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात मिठी नदी तुडुंब वाहू लागते त्यामुळे पुलाची रुंदी आणि उंचीही कमी असल्याने पाण्याच्या प्रवासातही अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.


आणखी एका पुलाची उभारणी


जुना पूल पाडल्यावर नवीन भक्कम पूल बांधेपर्यंत त्याला पर्याय म्हणून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पुलाच्या बाजूलाच एक तात्पुरता पूल बांधण्यात येणार आहे

Comments
Add Comment

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये