IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वन-डे सामना आज पर्थमध्ये रंगणार

कॅनबेरा : - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. जे दीर्घ विश्रांतीनंतर भारतीय जर्सीमध्ये मैदानावर परतणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हे दोन अनुभवी क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळतील. रोहित आणि कोहली या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून खेळले आणि आता मैदानात परतणार आहेत.


गेल्या सात महिन्यांत रोहित आणि कोहलीसाठी बरेच काही बदलले आहे. दोघेही २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. पण ही मालिका जागतिक स्पर्धेसाठी त्यांची तंदुरुस्ती निश्चित करेल. दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात सराव केला आहे. रोहितने वजन देखील कमी केले आहे. पण फॉर्ममध्ये परतणे दोघांसाठीही एक आव्हान असेल. कारण ते आयपीएलपासून खेळलेले नाहीत. दोघांसाठीही चांगली बाब अशी आहे की, त्यांचे पुनरागमन ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. कांगारुंविरुद्ध त्यांचा चांगला रेकॉर्ड आहे. ही मालिका त्यांच्या कारकिर्दीची भविष्यातील दिशा ठरवणारी आहे.


रोहित आणि कोहली आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतात. ते पुन्हा एकदा मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवुडशी सामना करतील. रोहित कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त होईल. ज्यामुळे तो मुक्तपणे खेळू शकेल. रोहित आणि कोहली यांच्या मनात २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक असेल यात शंका नाही. जर कोहली त्याच्या नेहमीच्या शैलीत लांब डाव खेळला आणि रोहितने चांगली सुरुवात केली. तर दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंची कारकीर्द आणखी काही वर्षे वाढू शकते.


गिलने कसोटीत भारताचा कर्णधार म्हणून आपले कौशल्य दाखवले आहे. आणि आता त्याच्यासमोर एकदिवसीय सामन्यांमध्ये ही गती कायम ठेवण्याचे आव्हान आहे. गिलसाठी आनंदाची बाबअशी आहे की, त्याला अशा वेळी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जेव्हा रोहित आणि कोहली देखील संघाचा भाग आहेत. त्याला या दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंकडून सल्ला घेण्याची संधी मिळेल. संघ संयोजनाबाबत, संघ व्यवस्थापन रोहित आणि गिलच्या सलामी जोडीशी छेडछाड करेल अशी शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत, यशस्वी जयस्वालला त्याच्या संधीची वाट पहावी लागू शकते.


रोहित आणि गिल डावाची सुरुवात करतील, तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल. राहुलकडे विकेटकीपिंगचीही जबाबदारी असेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकत नाही. त्यामुळे नितीश कुमार रेड्डीला एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करतील, तर मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग जलद गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

Comments
Add Comment

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत

एअर पिस्तूल स्पर्धेत भारताला अजिंक्यपद! २० वर्षीय नेमबाज राणा झाला 'सम्राट'

इजिप्त: कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल गटात एकूण २४३.७ गुणांसह युवा

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात खेळण्यास सज्ज! ऐतिहासिक ईडन गार्डनवर होणार पहिला कसोटी सामना

कोलकता: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

भारत - द. आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी, मग लंच ब्रेक!

क्रिकेटची सुमारे १५० वर्षांची परंपरा मोडीत मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी