'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून अनेक वाद बघायला मिळतात. सगळ्याच बाजूने विचार केला तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अशातच, दिल्ली उच्च न्यायालयाने या महत्वाच्या मुद्द्याचा निकाल लावला आहे. जोडीदार जर स्वतंत्र आणि स्वावलंबी असेल तर पोटगी देता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.


१७ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथ यांनी एका खटल्याचा निकाल लावला. भारतीय वाहतूक सेवेच्या गट "अ " च्या कर्मचारी यांनी मांडलेल्या मुद्यांवर सुनावणी करण्यात आली.



केस नक्की काय होती ?


एका वकिलाबरोबर २०१० साली रेल्वे मध्ये अधिकारी असलेल्या महिलेचे लग्न झाले होते. २०२३ साली मानसिक छळामुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचे समोर आले. पण घटस्फोटाच्या दरम्यान पतीने पोटगी देण्यास नाकारले. त्यामुळे, पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.


याचिका दाखल झाल्यावर पतीने पत्नीवर मानसिक छळाचे आरोप केले व अपशब्द , अपमानास्पद बोलणे, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात बदनामी करणे यांसारखे आरोप केले गेले. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला पण पत्नीने ५० लाखांची मागणी केली व तिच्या प्रतिज्ञापत्रातही ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे.



उच्च न्यायालयाचे म्हणणे काय होते ?


हिंदू विवाह कायदा कलम २५ चा दाखला देत उच्च न्यायालयाने घटस्फोट झालेल्या महिलेला पोटगी देण्यात येणार आहे. पतीचे वेतन, मालमत्ता , उत्पन्न , कमाई क्षमता , आणि सारासार विचार करून पोटगी निश्चित केली जाईल. परंतु पत्नी जर स्वावलंबी असेल तर पोटगी दिली नाही, जाणार असेही न्यायालयाने म्हटले.


न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार कलम २५ हे सर्वांना आर्थिक न्याय मिळून देते. घटस्फोटानंतर ज्याच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसलेला पक्ष निराधार होणार नाही याची खात्री केली जाते. तसेच पत्नी स्वावलंबी असेल तर पतीवर अन्याय होऊ देत नाही.


सध्याच्या केस मध्ये पत्नी ही स्वावलंबी व रेल्वे अधिकारी असल्यामुळे ती स्वतःचे पालनपोषण करू शकते. त्याचबरोबर, आर्थिक असमर्थता आणि दबाव यांचा कोणताच पुरावा नसल्यामुळे पत्नीने मांडलेली पोटगीची याचिका रद्द करण्यात आली.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला