मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या सेवनामुळे अनेक लहान मुलं दगावल्याने देशभर खळबळ माजलेली आहे. असे असताना आता त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर एका मालगाडीतून सुमारे २ कोटी किमतीचे बंदी घातलेले खोकल्याचे सिरप जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता सुरू झालेल्या आणि शुक्रवारी पहाटे संपलेल्या शोध मोहिमेनंतर ही जप्ती करण्यात आली आहे. तर त्रिपुरा पोलिसांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या लढाईत एक मोठे यश मिळवत, सरकारी रेल्वे पोलिस दल, सीमाशुल्क विभाग आणि विशेष कार्य दल यांनी ही संयुक्त कारवाई केली."


याचबरोबर पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "संयुक्त छाप्यादरम्यान, पथकांनी पश्चिम त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या दोन मालगाड्यांच्या वॅगनमधून बंदी घातलेल्या खोकल्याच्या सिरपच्या १०० मिलीच्या तब्बल ९० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत." याप्रकरणी अद्यापपर्यंत तरी कुणावरीही अटकेची कारवाई झालेली नव्हती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


भारतात मागील काही दिवसांत कफ सिरप घेतल्याने किडनी निकामी होवून किमान २२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता भारत सरकारने याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून, कोल्ड्रिफ, रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफ या तीन कफ सिरपना विषारी घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात