फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी फटाक्यांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे फटाके फोडून दिवाळी साजरी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या होलसेल बाजारात किरकोळ खरेदीदारांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. लहान-मोठे फटाके खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटाक्यांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.


दिवाळीच्या पाच ते सहा महिने अगोदर फटाके निर्मितीस प्रारंभ होतो. यंदा फटाके निर्मितीचे केंद्र असलेल्या तमिळनाडूमधील शिव काशी येथे अतिवृष्टी झाली. त्यामुळे फटाके निर्मितीमध्ये अडचणी आल्या. फटाके सुकण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र यंदा तेथे पावसामुळे फटाके सुकवण्यात अडचण निर्माण झाली. यामुळे तेथील कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवले होते. परिणामी देशात फटाक्यांची टंचाई निर्माण झाली असल्याचे, होलसेल विक्रेते राहुल घोणे यांनी सांगितले.कच्चे साहित्य महाग झाल्यानेही फटाक्यांच्या किमतीमध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. यातच फटाक्यांची वात तयार करणाऱ्या नागपूर येथील कंपनीला आग लागली होती. त्याचा फटाक्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यातच वातेची किंमत १० टक्क्यांनी वाढल्याचा परिणाम म्हणून फटाक्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. माल कमी आल्याने फटाक्यांच्या किमतीवरही याचा परिणाम झाल्याचे घोणे म्हणाले.


‘पॉप पॉप’ फटाक्याला मागणी
दरवर्षी फटाके बाजारात रंगीबेरंगी, विविध आवाज करणारे फटाके येतात. लहान मुलांना आकर्षक ठरणारे फटाके यंदाही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये लहान मुलांच्या आवडीच्या ‘पॉप पॉप’ फटाक्याला अधिक मागणी आहे. या फटाक्याच्या किमतीमध्येही वाढ झाली असल्याचेही घोणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य