PM Modi on Naxalites : आता तो दिवस दूर नाही…"नक्षलवाद संपणार, हीच मोदीची गॅरंटी!" पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, 'आनंदाचे दिवे लखलखतील'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माओवादी (Maoism) दहशतवादामुळे झालेल्या नुकसानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, या भागातील परिस्थिती बदलल्याबद्दल विश्वास दर्शवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या ५० ते ५५ वर्षांत माओवादामुळे हजारो निष्पाप लोकांचा हकनाक बळी गेला. कित्येक सुरक्षा रक्षकांना (Security Personnel) नक्षलवाद्यांमुळे प्राणाची आहुती द्यावी लागली आणि देशाला कित्येक नवतरुण गमावावे लागले. नक्षलवादी (Naxals) असलेल्या भागात माओवाद्यांनी कधीही शाळा होऊ दिल्या नाहीत आणि रुग्णालय (Hospital) बांधू दिले नाही. त्यांनी जितकी विकास कामे झाली, ती बॉम्बने उडवून टाकली. अनेक दशकांपासून विकासाचा किरण या भागात पोहोचला नाही, त्यामुळे एक मोठी लोकसंख्या माओवादी दहशतवादामुळे विकासापासून वंचित राहिली. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की, या भागातील परिस्थिती आता बदलली आहे. ५०-५५ वर्षांत ज्यांनी दिवाळी पाहिली नाही, त्यांना आता आनंदाने दिवे लावता येतील आणि त्यांची दिवाळी उजळून जाईल.



'माओवाद, नक्षलवाद आता संपणार!' पंतप्रधान मोदींचा विश्वास


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादाला 'माओवादाचा दहशतवाद' संबोधत या विषयावर सडेतोड भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांनी भारत लवकरच माओवादमुक्त आणि नक्षलमुक्त होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. पंतप्रधानांनी यावेळी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "काँग्रेसच्या काळात 'अर्बन नक्षलवाद' (Urban Naxalism) फोफावला." त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दहशतीच्या कोणत्याही घटना जगासमोर किंवा देशासमोर येत नव्हत्या. यासाठी काँग्रेस सरकार मोठे सेन्सॉरशिप (Censorship) चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी नक्षलग्रस्त भागातील बदलाची आकडेवारी दिली. ११ वर्षांपूर्वी देशातील १२५ हून अधिक जिल्हे नक्षलप्रभावित होते. आज ती संख्या अवघ्या ११ वर आली आहे. या ११ जिल्ह्यांपैकी केवळ ३ जिल्हे असे आहेत, जे सर्वाधिक नक्षलग्रस्त आहेत. विशेष म्हणजे, सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे केवळ ७५ तासांमध्ये ३०३ नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. हे सामान्य नक्षली नव्हते, तर अत्यंत जहाल माओवादी होते, ज्यांच्या डोक्यावर एक कोटी किंवा लाखोंचे बक्षीस होते. एकेकाळी ज्या १२५ जिल्ह्यांमध्ये केवळ गोळीची भाषा चालत होती, तिथे शांतता प्रस्थापित होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.



'मी अत्यंत जबाबदारीने सांगतो...'




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद आणि माओवाद (Maoism) या विषयावर बोलताना विरोधी पक्षांवर अत्यंत थेट आणि जबाबदारीपूर्वक विधान करत गंभीर आरोप केला. पंतप्रधान म्हणाले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातील प्रत्येक मोठे राज्य नक्षलवादी हिंसा आणि माओवादाने पीडित होते. उर्वरित देशात राज्य घटनेनुसार (Constitution) राज्य चालत होते, पण देशाच्या 'रेड कॉरिडॉर' (Red Corridor - नक्षलग्रस्त पट्टा) मध्ये राज्य घटनेचे नाव घेणेही अवघड होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जोरदार टीका करत म्हटले, "जे आज संविधानाची प्रत डोक्याला लावून नाचतात, त्यांनी माओवादी आणि नक्षलवाद्यांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस एक केले, असे मी (नरेंद्र मोदी) अत्यंत जबाबदारीने विधान करतो." पंतप्रधानांनी केलेला हा थेट आरोप, नक्षलवादाच्या मुळाशी असलेल्या राजकीय पाठिंब्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकतो आणि यामुळे देशाच्या राजकारणात मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.



बस्तरमध्ये आता 'शांती'चा खेळ


काही वर्षांपूर्वीपर्यंत छत्तीसगडमधील बस्तर (Bastar) भाग हा नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे आणि दहशतीमुळे ओळखला जात होता. एकेकाळी हा भाग नक्षलवाद्यांचा 'गड' होता आणि तिथे त्यांचेच राज्य चालत असे. पूर्वी माध्यमांत बस्तरमधील बातम्या देताना, 'इथे बॉम्बस्फोट झाला', 'इथे सुरक्षा रक्षक मारले गेले' अशा रक्तरंजित कारवायांचे मथळे झळकत होते. मात्र, आता या भागात मोठा आणि सकारात्मक बदल झाला आहे. 'बस्तर ऑलम्पिक'ची चर्चा: रक्तरंजित कारवायांच्या चर्चांऐवजी, आता बस्तर ऑलम्पिकची चर्चा सर्वत्र होत आहे. नक्षलवाद्यांचा गड असलेल्या या भागात तेथील तरुणांनीच बस्तर ऑलम्पिकचे यशस्वी आयोजन केले आहे. या खेळांमध्ये हजारो तरुण उत्साहाने सहभागी झाले आहेत. हा बदल शांतता आणि विकासाच्या दिशेने बस्तरची वाटचाल दर्शवतो.

Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक