Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने किंवा घरगुती वस्तू खरेदी करून शुभ शुभारंभ करतात, ज्यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. परंतु, जर तुम्हाला या धनतेरसला केवळ संपत्तीचेच नाही, तर आरोग्याचे वरदान देखील मिळवायचे असेल, तर भगवान विष्णूंच्या धन्वंतरि अवताराच्या मंदिरात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान धन्वंतरि हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. त्यांची उपासना केल्याने भाविकांना दीर्घायुष्य, निरोगीपणा (उत्तम आरोग्य) आणि मानसिक शांती प्राप्त होते, असे मानले जाते. संपूर्ण भारतात, विशेषतः खालील पाच महत्त्वाच्या मंदिरांमध्ये धनतेरसच्या दिवशी विशेष पूजा-अर्चा आणि आरोग्य कामना यज्ञ आयोजित केले जातात.



१. रंगनाथस्वामी मंदिर- श्रीरंगम, तमिळनाडू


तमिळनाडूतील प्रसिद्ध हे मंदिर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असलेल्या भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. धनतेरसच्या शुभदिनी या मंदिरात भगवान धन्वंतरिंची विशेष पूजा आयोजित केली जाते. या पूजेमध्ये औषधी वनस्पतींच्या प्रसादाचा समावेश असतो. हा प्रसाद भक्तांना वाटला जातो, जो त्यांना आरोग्य आणि आयुष्यवृद्धीचं आशीर्वाद देतो.



२. श्री धन्वंतरि आरोग्य पीठम- चेन्नई, तमिळनाडू


चेन्नई येथे असलेले हे प्राचीन मंदिर आरोग्य साधनेचं केंद्र म्हणून ओळखले जाते. धनतेरसच्या दिवशी या ठिकाणी विशेषतः आरोग्यपूजा आणि आयुर्वेदिक मंत्रोच्चार केले जातात. भक्तगण मोठ्या श्रद्धेने भगवान धन्वंतरिला औषधी वनस्पतींच्या माळा अर्पण करतात. या ठिकाणी पूजन केल्याने गंभीर आजारांपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते, अशी प्रबळ श्रद्धा आहे.



३. धन्वंतरि मंदिर- तिरुमला, आंध्र प्रदेश


तिरुमला येथील हे धन्वंतरि मंदिर आपल्या अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जेसाठी आणि आरोग्यदायी स्पंदनांसाठी प्रसिद्ध आहे. धनतेरसच्या निमित्ताने येथे “धन्वंतरि होमम” नावाचा मोठा विधी केला जातो. या होममद्वारे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि सर्व नागरिकांना रोग-व्याधींमधून सुटका मिळावी म्हणून सामूहिक प्रार्थना केली जाते.



४. थोट्टुवा धन्वंतरि मंदिर- केरळ


केरळ राज्यातील थोट्टुवा हे ठिकाण भगवान धन्वंतरिंच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे स्वतः भगवान धन्वंतरि वास करतात, अशी स्थानिक श्रद्धा आहे. धनतेरसच्या काळात येथे हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने येथे पूजा केल्यास त्यांना आरोग्यसंपन्न जीवन लाभते, असा भक्तांचा विश्वास आहे.



५. श्री पद्मनाभस्वामी मंदिर – तिरुवनंतपुरम, केरळ


हे जगातील सर्वाधिक संपन्न मंदिरांपैकी एक असून येथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आराधना केली जाते. धनतेरसच्या दिवशी या मंदिरात 'स्वर्ण पुष्प अर्चना' (सोन्याच्या फुलांची पूजा) केली जाते.भक्तांच्या मते, या विशेष पूजेमुळे जीवनात स्थायी समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते.



६. धन्वंतरी मंदिर, नेल्लुवाई


भारतातील प्राचीनतम धन्वंतरि मंदिरांमध्ये नेल्लुवाईच्या धन्वंतरि मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या मंदिराची उत्पत्ती सुमारे ५००० वर्षांहून अधिक जुनी मानली जाते. अशी मान्यता आहे की, या मंदिरातील भगवान धन्वंतरिंची मूर्ती अश्विनी देव यांनी स्वतः स्थापित केली होती. विशेष म्हणजे, या मूर्तीची पूजा स्वयं देवी लक्ष्मीने (Goddess Lakshmi) केली होती, त्यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक आहे.


धनतेरस हा केवळ संपत्ती खरेदी करण्याचा दिवस नाही, तर आरोग्य, आयुष्य आणि आंतरिक समाधानाचा उत्सव आहे. या दिवशी भगवान धन्वंतरिच्या मंदिरात जाऊन आरोग्यसंपन्न जीवनाची प्रार्थना करणं, म्हणजेच खऱ्या अर्थाने धनाची प्राप्ती करून घेणे होय.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला