Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने किंवा घरगुती वस्तू खरेदी करून शुभ शुभारंभ करतात, ज्यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. परंतु, जर तुम्हाला या धनतेरसला केवळ संपत्तीचेच नाही, तर आरोग्याचे वरदान देखील मिळवायचे असेल, तर भगवान विष्णूंच्या धन्वंतरि अवताराच्या मंदिरात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान धन्वंतरि हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. त्यांची उपासना केल्याने भाविकांना दीर्घायुष्य, निरोगीपणा (उत्तम आरोग्य) आणि मानसिक शांती प्राप्त होते, असे मानले जाते. संपूर्ण भारतात, विशेषतः खालील पाच महत्त्वाच्या मंदिरांमध्ये धनतेरसच्या दिवशी विशेष पूजा-अर्चा आणि आरोग्य कामना यज्ञ आयोजित केले जातात.



१. रंगनाथस्वामी मंदिर- श्रीरंगम, तमिळनाडू


तमिळनाडूतील प्रसिद्ध हे मंदिर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असलेल्या भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. धनतेरसच्या शुभदिनी या मंदिरात भगवान धन्वंतरिंची विशेष पूजा आयोजित केली जाते. या पूजेमध्ये औषधी वनस्पतींच्या प्रसादाचा समावेश असतो. हा प्रसाद भक्तांना वाटला जातो, जो त्यांना आरोग्य आणि आयुष्यवृद्धीचं आशीर्वाद देतो.



२. श्री धन्वंतरि आरोग्य पीठम- चेन्नई, तमिळनाडू


चेन्नई येथे असलेले हे प्राचीन मंदिर आरोग्य साधनेचं केंद्र म्हणून ओळखले जाते. धनतेरसच्या दिवशी या ठिकाणी विशेषतः आरोग्यपूजा आणि आयुर्वेदिक मंत्रोच्चार केले जातात. भक्तगण मोठ्या श्रद्धेने भगवान धन्वंतरिला औषधी वनस्पतींच्या माळा अर्पण करतात. या ठिकाणी पूजन केल्याने गंभीर आजारांपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते, अशी प्रबळ श्रद्धा आहे.



३. धन्वंतरि मंदिर- तिरुमला, आंध्र प्रदेश


तिरुमला येथील हे धन्वंतरि मंदिर आपल्या अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जेसाठी आणि आरोग्यदायी स्पंदनांसाठी प्रसिद्ध आहे. धनतेरसच्या निमित्ताने येथे “धन्वंतरि होमम” नावाचा मोठा विधी केला जातो. या होममद्वारे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि सर्व नागरिकांना रोग-व्याधींमधून सुटका मिळावी म्हणून सामूहिक प्रार्थना केली जाते.



४. थोट्टुवा धन्वंतरि मंदिर- केरळ


केरळ राज्यातील थोट्टुवा हे ठिकाण भगवान धन्वंतरिंच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे स्वतः भगवान धन्वंतरि वास करतात, अशी स्थानिक श्रद्धा आहे. धनतेरसच्या काळात येथे हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने येथे पूजा केल्यास त्यांना आरोग्यसंपन्न जीवन लाभते, असा भक्तांचा विश्वास आहे.



५. श्री पद्मनाभस्वामी मंदिर – तिरुवनंतपुरम, केरळ


हे जगातील सर्वाधिक संपन्न मंदिरांपैकी एक असून येथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आराधना केली जाते. धनतेरसच्या दिवशी या मंदिरात 'स्वर्ण पुष्प अर्चना' (सोन्याच्या फुलांची पूजा) केली जाते.भक्तांच्या मते, या विशेष पूजेमुळे जीवनात स्थायी समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते.



६. धन्वंतरी मंदिर, नेल्लुवाई


भारतातील प्राचीनतम धन्वंतरि मंदिरांमध्ये नेल्लुवाईच्या धन्वंतरि मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या मंदिराची उत्पत्ती सुमारे ५००० वर्षांहून अधिक जुनी मानली जाते. अशी मान्यता आहे की, या मंदिरातील भगवान धन्वंतरिंची मूर्ती अश्विनी देव यांनी स्वतः स्थापित केली होती. विशेष म्हणजे, या मूर्तीची पूजा स्वयं देवी लक्ष्मीने (Goddess Lakshmi) केली होती, त्यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक आहे.


धनतेरस हा केवळ संपत्ती खरेदी करण्याचा दिवस नाही, तर आरोग्य, आयुष्य आणि आंतरिक समाधानाचा उत्सव आहे. या दिवशी भगवान धन्वंतरिच्या मंदिरात जाऊन आरोग्यसंपन्न जीवनाची प्रार्थना करणं, म्हणजेच खऱ्या अर्थाने धनाची प्राप्ती करून घेणे होय.

Comments
Add Comment

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक