Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने किंवा घरगुती वस्तू खरेदी करून शुभ शुभारंभ करतात, ज्यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. परंतु, जर तुम्हाला या धनतेरसला केवळ संपत्तीचेच नाही, तर आरोग्याचे वरदान देखील मिळवायचे असेल, तर भगवान विष्णूंच्या धन्वंतरि अवताराच्या मंदिरात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान धन्वंतरि हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. त्यांची उपासना केल्याने भाविकांना दीर्घायुष्य, निरोगीपणा (उत्तम आरोग्य) आणि मानसिक शांती प्राप्त होते, असे मानले जाते. संपूर्ण भारतात, विशेषतः खालील पाच महत्त्वाच्या मंदिरांमध्ये धनतेरसच्या दिवशी विशेष पूजा-अर्चा आणि आरोग्य कामना यज्ञ आयोजित केले जातात.



१. रंगनाथस्वामी मंदिर- श्रीरंगम, तमिळनाडू


तमिळनाडूतील प्रसिद्ध हे मंदिर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असलेल्या भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. धनतेरसच्या शुभदिनी या मंदिरात भगवान धन्वंतरिंची विशेष पूजा आयोजित केली जाते. या पूजेमध्ये औषधी वनस्पतींच्या प्रसादाचा समावेश असतो. हा प्रसाद भक्तांना वाटला जातो, जो त्यांना आरोग्य आणि आयुष्यवृद्धीचं आशीर्वाद देतो.



२. श्री धन्वंतरि आरोग्य पीठम- चेन्नई, तमिळनाडू


चेन्नई येथे असलेले हे प्राचीन मंदिर आरोग्य साधनेचं केंद्र म्हणून ओळखले जाते. धनतेरसच्या दिवशी या ठिकाणी विशेषतः आरोग्यपूजा आणि आयुर्वेदिक मंत्रोच्चार केले जातात. भक्तगण मोठ्या श्रद्धेने भगवान धन्वंतरिला औषधी वनस्पतींच्या माळा अर्पण करतात. या ठिकाणी पूजन केल्याने गंभीर आजारांपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते, अशी प्रबळ श्रद्धा आहे.



३. धन्वंतरि मंदिर- तिरुमला, आंध्र प्रदेश


तिरुमला येथील हे धन्वंतरि मंदिर आपल्या अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जेसाठी आणि आरोग्यदायी स्पंदनांसाठी प्रसिद्ध आहे. धनतेरसच्या निमित्ताने येथे “धन्वंतरि होमम” नावाचा मोठा विधी केला जातो. या होममद्वारे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि सर्व नागरिकांना रोग-व्याधींमधून सुटका मिळावी म्हणून सामूहिक प्रार्थना केली जाते.



४. थोट्टुवा धन्वंतरि मंदिर- केरळ


केरळ राज्यातील थोट्टुवा हे ठिकाण भगवान धन्वंतरिंच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे स्वतः भगवान धन्वंतरि वास करतात, अशी स्थानिक श्रद्धा आहे. धनतेरसच्या काळात येथे हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने येथे पूजा केल्यास त्यांना आरोग्यसंपन्न जीवन लाभते, असा भक्तांचा विश्वास आहे.



५. श्री पद्मनाभस्वामी मंदिर – तिरुवनंतपुरम, केरळ


हे जगातील सर्वाधिक संपन्न मंदिरांपैकी एक असून येथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आराधना केली जाते. धनतेरसच्या दिवशी या मंदिरात 'स्वर्ण पुष्प अर्चना' (सोन्याच्या फुलांची पूजा) केली जाते.भक्तांच्या मते, या विशेष पूजेमुळे जीवनात स्थायी समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते.



६. धन्वंतरी मंदिर, नेल्लुवाई


भारतातील प्राचीनतम धन्वंतरि मंदिरांमध्ये नेल्लुवाईच्या धन्वंतरि मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या मंदिराची उत्पत्ती सुमारे ५००० वर्षांहून अधिक जुनी मानली जाते. अशी मान्यता आहे की, या मंदिरातील भगवान धन्वंतरिंची मूर्ती अश्विनी देव यांनी स्वतः स्थापित केली होती. विशेष म्हणजे, या मूर्तीची पूजा स्वयं देवी लक्ष्मीने (Goddess Lakshmi) केली होती, त्यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक आहे.


धनतेरस हा केवळ संपत्ती खरेदी करण्याचा दिवस नाही, तर आरोग्य, आयुष्य आणि आंतरिक समाधानाचा उत्सव आहे. या दिवशी भगवान धन्वंतरिच्या मंदिरात जाऊन आरोग्यसंपन्न जीवनाची प्रार्थना करणं, म्हणजेच खऱ्या अर्थाने धनाची प्राप्ती करून घेणे होय.

Comments
Add Comment

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण

मोबाईल गेमची सवय जीवघेणी ठरली, पॉप्युलर गेम खेळताना मुलाचा प्राण गेला

लखनऊ: मोबाईल गेमच्या व्यसनामुळे एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

Garib Rath Express Fire : गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग! 'ज्वाळा' पाहून प्रवाशांना फुटला घाम; अनेकजण जखमी, रेल्वेने दिली 'ही' माहिती

अमृतसर : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आज, शनिवारी, सकाळी अचानक मोठा गोंधळ आणि अफरातफरी माजली. लुधियानाहून

'अत्याधुनिक विमानाचे उड्डाण हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक', संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार

नाशिक: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाच्या 'तेजस एमके 1 ए' च्या

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.