विराट आणि रोहित २०२७ विश्वचषकापर्यंत नक्की खेळतील - ट्रॅव्हिस हेड

कॅनबेरा : भारतीय वेळेनुसार रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेड आणि अक्षर पटेल यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड याला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे भविष्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ट्रॅव्हिस हेडचा म्हणलं कि, विराट आणि रोहित 2027 विश्वचषकापर्यंत नक्की खेळतील आणि बाजूला उभा असलेला अक्षर पटेल हसून गेला.

पर्थमध्ये शुक्रवार रोजी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रॅव्हिस हेड आणि अक्षर पटेल एकत्र होते.हेडला जेव्हा विराट आणि रोहितच्या भविष्यावर विचारलं, तेव्हा त्याने उत्तर दिलं “ते दोघंही भारतासाठी जबरदस्त खेळले आहेत. मला वाटतं अक्षर त्यांच्याबद्दल अधिक चांगलं सांगू शकेल, पण हे दोन खेळाडू पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ आहेत.विराट कदाचित व्हाईट-बॉल क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू आहे, आणि रोहित त्याच्या फार मागे नाही.”

हेड पुढे म्हणाला “सलामीवीर म्हणून रोहितने जे काही केलं, त्याबद्दल मला खूप आदर आहे. कधीतरी त्यांची कमतरता नक्कीच जाणवेल. पण मला वाटतं ते दोघंही 2027 पर्यंत खेळतील.”हे बोलताच त्याने अक्षरकडे पाहिलं आणि अक्षर हसला. त्यावर हेड म्हणाला, “ते दोघंही प्रयत्न करत आहेत की 2027 विश्वचषकापर्यंत खेळावं. हे खेळासाठी चांगलं आहे की ते अजूनही खेळत आहेत.”

भारतीय अष्टपैलू अक्षर पटेलनेही विराट आणि रोहितबद्दल बोलताना सांगितलं की, “ते दोघंही व्यावसायिक खेळाडू आहेत, त्यांना काय करावं लागेल हे माहित आहे. ते सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.” अक्षर म्हणाला ,“जर तुम्ही त्यांच्या फॉर्मबद्दल विचार करत असाल, तर ते चांगली तयारी करत आहेत. सर्वांनी आपले फिटनेस टेस्ट दिले आहेत, आणि आता ते खेळण्यासाठी पूर्ण तयार आहेत.”

Comments
Add Comment

टीम इंडियाच्या 'अपोलो टायर्स' जर्सीचा लूक समोर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी पर्थमध्ये फोटोशूट

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या

India-Australia ODI XI : कमिन्सची ऑल-टाईम टीम जाहीर! रोहित-विराटला नाही स्थान; पॅट कमिन्सच्या टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका (ODI Series) १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार

FIFA World Cup 2026 : ४८ संघ घेणार फुटबॉलच्या महासंग्राममध्ये सहभाग, या संघांनी केले क्वालिफाय

मुंबई: फिफा विश्वचषक २०२६ फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. कारण, यावेळी प्रथमच या स्पर्धेत

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून

अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधनाला आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार

दुबई : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

WTC Time Table : पाकिस्तानच्या विजयाने टीम इंडियाला फटका, पाहा कोण आहे अव्वल

नवी दिल्ली: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२०२७ च्या गुणतालिकेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. पाकिस्तान