राष्ट्रीय महामार्गावर ‘राजमार्गयात्रा’अॅप सोयीस्कर

मुंबई  : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासादरम्यान पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र किंवा हॉस्पिटल कुठे आहे, हे शोधण्यासाठी आता वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार नाही. केंद्र सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी ‘राजमार्गयात्रा’ नावाचे नवे मोबाईल ॲप विकसित केले आले आहे. याअॅपमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हे ॲप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) विकसित केले आहे.


या ॲपमध्ये आधुनिक जीपीएस-आधारित प्रणाली वापरली आहे. या प्रणालीमुळे प्रवासी आपल्या सध्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या सर्व सुविधांची माहिती नकाशावर सहज पाहू शकतात. या ॲपच्या मदतीने, प्रवाशांना पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र, खाद्यपदार्थ स्टॉल, हॉस्पिटल, पार्किंग क्षेत्र आणि फर्स्ट एड सेंटर यांची माहिती अगदी अचूकपणे मिळते. प्रवासादरम्यान अचानक एखादी अडचण आली, अपघात झाला किंवा रस्त्यावर कुठे मोठा अडथळा निर्माण झाला, तर अॅपवरून ‘हायवे हेल्पलाइन’वर तक्रार नोंदवू शकतात. ॲपमध्ये थेट तक्रार नोंदवण्याची सोय असल्याने, प्रशासनाला नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करता येते. यामुळे महामार्गावर प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळबचतीचा होण्यासाठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना