राष्ट्रीय महामार्गावर ‘राजमार्गयात्रा’अॅप सोयीस्कर

मुंबई  : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासादरम्यान पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र किंवा हॉस्पिटल कुठे आहे, हे शोधण्यासाठी आता वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार नाही. केंद्र सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी ‘राजमार्गयात्रा’ नावाचे नवे मोबाईल ॲप विकसित केले आले आहे. याअॅपमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हे ॲप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) विकसित केले आहे.


या ॲपमध्ये आधुनिक जीपीएस-आधारित प्रणाली वापरली आहे. या प्रणालीमुळे प्रवासी आपल्या सध्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या सर्व सुविधांची माहिती नकाशावर सहज पाहू शकतात. या ॲपच्या मदतीने, प्रवाशांना पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र, खाद्यपदार्थ स्टॉल, हॉस्पिटल, पार्किंग क्षेत्र आणि फर्स्ट एड सेंटर यांची माहिती अगदी अचूकपणे मिळते. प्रवासादरम्यान अचानक एखादी अडचण आली, अपघात झाला किंवा रस्त्यावर कुठे मोठा अडथळा निर्माण झाला, तर अॅपवरून ‘हायवे हेल्पलाइन’वर तक्रार नोंदवू शकतात. ॲपमध्ये थेट तक्रार नोंदवण्याची सोय असल्याने, प्रशासनाला नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करता येते. यामुळे महामार्गावर प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळबचतीचा होण्यासाठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या