राष्ट्रीय महामार्गावर ‘राजमार्गयात्रा’अॅप सोयीस्कर

मुंबई  : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासादरम्यान पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र किंवा हॉस्पिटल कुठे आहे, हे शोधण्यासाठी आता वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार नाही. केंद्र सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी ‘राजमार्गयात्रा’ नावाचे नवे मोबाईल ॲप विकसित केले आले आहे. याअॅपमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हे ॲप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) विकसित केले आहे.


या ॲपमध्ये आधुनिक जीपीएस-आधारित प्रणाली वापरली आहे. या प्रणालीमुळे प्रवासी आपल्या सध्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या सर्व सुविधांची माहिती नकाशावर सहज पाहू शकतात. या ॲपच्या मदतीने, प्रवाशांना पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र, खाद्यपदार्थ स्टॉल, हॉस्पिटल, पार्किंग क्षेत्र आणि फर्स्ट एड सेंटर यांची माहिती अगदी अचूकपणे मिळते. प्रवासादरम्यान अचानक एखादी अडचण आली, अपघात झाला किंवा रस्त्यावर कुठे मोठा अडथळा निर्माण झाला, तर अॅपवरून ‘हायवे हेल्पलाइन’वर तक्रार नोंदवू शकतात. ॲपमध्ये थेट तक्रार नोंदवण्याची सोय असल्याने, प्रशासनाला नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करता येते. यामुळे महामार्गावर प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळबचतीचा होण्यासाठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने