रुग्णांच्या आहाराची आता महापालिका घेणार अतिविशेष काळजी

दहा उपनगरीय रुग्णालयामध्ये आहार पुरवण्यासाठी मागवल्या निविदा


आहार तज्ञांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रुग्णांना पौष्टिक आणि सकस आहारावर भर


मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या आरोग्या बरोबरच आहाराची काळजी घेतली जाते. रुग्णांच्या आहारात दुपार आणि रात्रीच्या जेवण तसेच सकाळ ची न्याहारी आदींची व्यवस्था ही रुग्णालय व्यवस्थापनाच्या माध्यमातून करण्यात येत असते. मात्र रुग्णांच्या आरोग्याची आता विशेष काळजी घेत आहार तज्ञांनी बनवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रुग्णांना आहार आणि देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने आता सुरुवात केली आहे.


महापालिकेच्या दहा रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या आहारासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या या मार्गदर्शक तत्त्वानुसारच जेवण आणि नाश्ता पुरवण्याचा विचार केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून आता महापालिका आरोग्य विभागाने दहा उपनगरीय रुग्णालयासाठी निविदा मागवल्या आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक पौष्टिक आणि सकस आहारावर आता महापालिका आरोग्य विभाग अधिक भर देणार आहे.


मुंबई महापालिकेच्या दहा रुग्णालयांतील रुग्णांना पौष्टिक, नियोजित आणि त्यांच्या आजारानुसार विशेष आहार मिळावा, यासाठी पालिकेने ‘शिजवलेल्या आहार पुरवठ्या’च्या नव्या करारासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत मधुमेह (डायबेटिक), उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मीठविरहित (सॉल्ट फ्री), मीठमर्यादित (सॉल्ट रेस्ट्रिक्टेड) आणि आरटी फीड (नळीमार्गे दिला जाणारा द्रव आहार) या प्रकारच्या विशेष आहाराचा पुरवठा रुग्णांना होणार आहे. या माध्यमातून दररोज १६०० रुग्णांना नाष्टा, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आणि चहा-बिस्कीट अशी सेवा पुरवली जाणार आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाच्या रुग्णसेवेसोबत चांगल्या दर्जाचा आणि पौष्टिक आहार मिळणार आहे.


या रुग्णालयांचा समावेश


एस. के. पाटील रुग्णालय (मालाड), एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय (मालाड), श्री हरिलाल भगवती रुग्णालय (बोरिवली), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (बोरिवली), दयाबेन मेहता (एमएए) रुग्णालय (चेंबूर), पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय (गोवंडी) , सावरकर रुग्णालय (मुलुंड), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (कांदिवली), राजावाडी रुग्णालय (घाटकोपर), कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालय (चिंचपोकळी).



असा असणार आहार...


सकाळचा नाष्टा : साखरविरहित चहा, उपमा/पोहे/रवा/शिरा/दलिया, इडली चटणी, फळ (केळी/मोसंबी/सफरचंद)


दुपार रात्रीचे जेवण : भात, चपाती, डाळ/सांबार/कढी, भाजी (मूळभाज्या मर्यादित), उसळ/पनीर/सोया, दही, सलाड, चटणी


मीठमुक्त/मीठ-नियंत्रित आहार : जास्त मीठ, सुद्धा कांदा-लसूण मिश्रण, मेवा, मीठकट पदार्थ वर्ज्य


लिक्विड/आरटी-फीड : ज्या रुग्णांना चावता/खाता येत नाही, त्यांना ब्लेंडरमध्ये मिक्स अन्न (भात, डाळ, भाज्या, दूध, तेल, फळे) ५०० मिली प्रमाणात देणे.

Comments
Add Comment

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण जगजाहीर...

मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर

Dharmendra Hospital Video Leak : अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत क्रिटिकल; हॉस्पिटलमधील VIDEO लीक, पत्नी प्रकाश कौर ढसाढसा रडल्या

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या नाजूक प्रकृतीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण असतानाच,

मुंबईतील उद्यान विभागाच्या निविदा होणार रद्द? महापालिका उद्यान विभागाकडून अनामत स्वीकारण्याच्या परिपत्रकाचे उल्लंघन

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील उद्यान विभागाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मागवण्यात आलेली निविदा वादात

Mangesh Desai : आता 'धर्मवीर ३' नाही, तर 'गुवाहाटी फाइल्स'? निर्माते मंगेश देसाईंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; म्हणाले...

मुंबई : दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे