दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. इंदापूर, माणगाव आणि संगमेश्वर यांसारख्या प्रमुख ठिकाणी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्ग अर्धा तासापेक्षा अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाला होता.


वाहतूक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही इंदापूर आणि माणगाव भागात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू राहिली.



वाहतूक कोंडीची मुख्य कारणे


या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्यामागे अनेक कारणे आहेत.


रस्त्यांवरील खड्डे: पावसाळ्यातील आणि सुरू असलेल्या बांधकाम कामांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो.


अतिघाई आणि नियमांचे उल्लंघन: वाहनचालकांकडून सर्वात पुढे जाण्यासाठी अतिघाईने ओव्हरटेक करणे.


विरुद्ध दिशेने ड्रायव्हिंग: अनेक वाहनचालक सर्रास नियम तोडून आपली वाहने विरुद्ध दिशेने चालवतात, ज्यामुळे मोठी कोंडी निर्माण होते.


वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते: 'ही वाहतूक कोंडी कोण सोडवणार?', 'रस्त्यांतील खड्ड्यांचा हा प्रवास कधी संपणार?' आणि 'वाहनचालकांचा नियमभंग कधी थांबणार?' महामार्गावरील दुरवस्था आणि प्रशासनाचे अपुरे नियोजन यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला.

Comments
Add Comment

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक