'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा आगामी चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असून याबद्दल रिंकूने अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर सांगितले आहे. दीपक पाटील दिग्दर्शित आशा या चित्रपटात रिंकू आशा सेविकेच्या भूमिकेत दिसणार आहे.


‘बाई अडलीये म्हणून ती नडलीये!’ अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमात समाजातील महिलांच्या सामर्थ्याचा आणि संघर्षाचा विषय मांडला आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणारा रिंकूचा कणखर चेहरा प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आहे. या चित्रपटात रिंकूसोबत दिशा दानडे, साईंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भूजबळ, सुहास शिरसाट आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.


महत्त्वाचे म्हणजे 'आशा' या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे ‘आशा’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, हा सिनेमा रिंकूच्या अभिनय कारकिर्दीत नवी उंची निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


जागतिक कन्या दिनानिमित्त १० ऑक्टोबरला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत 'आशा' चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडली. यावेळी महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा