मुंबई-ठाण्यात पावसामुळे नागरिकांची तारांबळ; दिवाळीच्या खरेदीला मोठा फटका!

हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' खरा ठरला; पुढील ६ ते ७ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज


मुंबई/ठाणे: पाऊस परत आला! हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत आज (गुरुवारी) सायंकाळच्या सुमारास मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.



हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' ठरला खरा


हवामान खात्याने आज राज्यातील १३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला, ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली होती. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर यांसारख्या उपनगरांमध्ये सायंकाळी अचानक कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी, जनजीवनावर मोठा परिणाम झाला.



दिवाळी खरेदीला फटका


दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर असल्याने बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने फटाक्यांची आणि दिवाळी साहित्याची दुकाने थाटलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बदलापूरमध्ये अनेक व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.


ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या.


ग्रामीण भागात शेतात कापून ठेवलेले भात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.


कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी धावपळ उडाली. कल्याण-डोंबिवलीच्या काही भागांमध्ये बत्तीगुल झाली होती.



पुढील ६-७ दिवसांसाठी इशारा


हवामान खात्याने पुढील ६ ते ७ दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहून अधूनमधून सौम्य पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



सायंकाळच्या पावसाची नोंद (१८:०० ते १९:०० तास)


शहर (कुलाबा पंपिंग): १५ मिमी


पूर्व उपनगर (ES - S ward): १६ मिमी


पश्चिम उपनगर (WS): हलका पाऊस

Comments
Add Comment

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक