मोबाइलवर सतत बोलत राहण्याच्या धमकीने मुलीची आत्महत्या

नांदगाव मुरुड :मुरुड तालुक्यातील खारमजगाव येथील एका मुलीला मोबाइलवर सतत माझ्याशी बोलली नाहीस तर तुझी बदनामी करीन अशी धमकी तिला देण्यात आली. या धमकीला कंटाळू्न मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.


सदर घटनेची तक्रार मुरुड पोलिसात दाखल होताच तत्काळ मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन फॉरेन्सिक टिमसह घटनास्थळी पोहोचून सविस्तर माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. खार माजगाव येथील नथुराम वाडकर यांची मुलगी महाविद्यालयात शिकत होती. त्याच गावातील एक रहिवासी हेमंत कांबळे हा विवाहीत असून सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्याशी वारंवार फोनवरून चॅटिंग करीत तिचा मोबाइलवर पाठलाग करून कॉलवर बोलली नाहीस तर तुझ्या कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींना आपल्या दोघांच्या संबंधाबद्दल सांगून तुझी बदनामी करेन, तुला जगू देणार नाही अशी धमकी देऊन प्रेम संबंध नसतानादेखील गावात त्यांचे प्रेम संबंध असल्याची बतावणी करीत असल्याने या मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल हेमंत कांबळे विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment

आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

मुंबई  : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २०२६ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने

उत्तन-विरार सी लिंकला हिरवा कंदील

५८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

ट्रायची स्पॅम कॉलवर कारवाई करण्यास सुरुवात

मुंबई : अनेक दिवसांपासून मोबाईल युजर्स हे स्पॅम कॉलबाबत तक्रारी करत होते. अनेकांना अनोळखी नंबरवरून कॉल यायचे आणि