मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली

मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक ९ ऑक्टोबरपर्यंत, १०५ वर होता आता तो तिप्पट वाढला असून १३९ च्या आसपास पोहोचला आहे. तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि देवनार येथे अनुक्रमे २२१ आणि २३५ वायू गुणवत्ता निर्देशांक नोंदवले गेले आहे. ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत असून येणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढून 'अत्यंत खराब' स्तरावर पोहोचू शकते.


हवामानशास्त्रज्ञ आणि वातावरण शास्त्रज्ञांनी मुंबईतील सध्याच्या हवामान घटनेला ला-निना हवामान पद्धतीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच मान्सून काळात वारंवार झालेल्या पावसामुळे धूलिकण धुऊन निघाल्याने प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र, पावसाचे प्रमाण घटल्याने वाढलेले तापमान आणि स्थिर हवामानामुळे वातावरणात धूर व धूळ साचू लागले आहेत.


पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल आणि सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळ, तसेच आगामी दिवाळीतील फटाक्यांचा धूर या कारणांमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची
शक्यता आहे

Comments
Add Comment

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे