महाराष्ट्रात मतदार याद्या अपडेट करण्यासाठी SIR होणार ?


मुंबई : बिहारमध्ये मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने सखोल मतदार यादी तपासणी प्रक्रिया अर्थात Special Intensive Revision (SIR) राबवली. काँग्रेससह अनेक विरोधक सुरवातीला या एसआयआरला विरोध करत होते. पण नंतर त्यांचा विरोध मावळला. महाराष्ट्रात थोडं वेगळं चित्र आहे. महाराष्ट्रात अद्याप एसआयआर झालेले नाही. पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या प्रसंगी आधी मतदार यादी सुधारा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. सर्व विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या सूरात सूर मिसळले. यामुळे राज्यात मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच एसआयआर करण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांचा वापर करुन तयारी पूर्ण करावी यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी स्पष्ट भूमिका राज्यातील सत्ताधारी महायुतीने घेतली आहे. आता महायुती आणि विरोधक दोघांचे एकमत असल्यामुळे निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रात एसआयआर करण्याची शक्यता आहे.


याआधी मंगळवारी राज ठाकरे यांनी मतदार यादीत काही ठिकाणी नोंदी करताना चुका झाल्याचे सांगितले आणि उदाहरण पण दिले. एके ठिकाणी मतदार यादीमध्ये वडिलांपेक्षा मुलाचे वय जास्त दाखवण्यात आले आहे. हा मतदार यादीतील घोळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. यामुळे आधी मतदार यादी सुधारा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी राज ठाकरेंसह सर्व विरोधकांनी घेतली. सोमवारी विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली तर मंगळवारी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दोन्ही प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदार यादीच्या सुधारणेसाठी आग्रह धरला. यामुळेच राज्यात एसआयआर लवकरच राबवले जाण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख