पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रिलायन्स फाउंडेशनने एक व्यापक मदत मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांना अन्न, पाणी, औषधं, आणि जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

पूर ओसरताच रिलायन्स फाउंडेशनचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वाधिक फटका बसलेल्या भागांची पाहणी करून, त्या ठिकाणी काय आवश्यक आहे, हे समजून घेतले. यानंतर रिलायन्स रिटेलच्या सहाय्याने अन्न, वस्त्र, आणि जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

पशुधनाचे संरक्षण


पूरानंतर जनावरांमध्ये रोगांचा धोका लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हॅमोरॅजिक सेप्टीसेमिया आणि ब्लॅक क्वार्टर या रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी सुमारे २२,००० जनावरांना लस देण्यात आली. यासोबतच प्रभावित भागांतील शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटपही करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील गोठ्यांमध्ये जनावरांसह राहत असलेल्या नागरिकांसाठीही अशीच वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

अन्न आणि आरोग्य सुविधा उपलब्ध


पूरग्रस्त कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये, रिलायन्स फाउंडेशनने सामुदायिक स्वयंपाकगृहे चालू करून ताजे आणि पौष्टिक अन्न पुरवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेऊन, खराब झालेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित केल्या गेल्या.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी दरम्यान आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि औषधांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जीवनसत्त्वांचा पुरवठाही केला जात आहे.

“मध्य महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहून आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील नागरिकांचे आयुष्य पुन्हा मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.

रिलायन्स फाउंडेशनने याआधीही पंजाब, आसाम, उत्तराखंडसह इतर राज्यांतील नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. संकटाच्या वेळी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील