पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रिलायन्स फाउंडेशनने एक व्यापक मदत मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांना अन्न, पाणी, औषधं, आणि जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

पूर ओसरताच रिलायन्स फाउंडेशनचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वाधिक फटका बसलेल्या भागांची पाहणी करून, त्या ठिकाणी काय आवश्यक आहे, हे समजून घेतले. यानंतर रिलायन्स रिटेलच्या सहाय्याने अन्न, वस्त्र, आणि जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

पशुधनाचे संरक्षण


पूरानंतर जनावरांमध्ये रोगांचा धोका लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हॅमोरॅजिक सेप्टीसेमिया आणि ब्लॅक क्वार्टर या रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी सुमारे २२,००० जनावरांना लस देण्यात आली. यासोबतच प्रभावित भागांतील शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटपही करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील गोठ्यांमध्ये जनावरांसह राहत असलेल्या नागरिकांसाठीही अशीच वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

अन्न आणि आरोग्य सुविधा उपलब्ध


पूरग्रस्त कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये, रिलायन्स फाउंडेशनने सामुदायिक स्वयंपाकगृहे चालू करून ताजे आणि पौष्टिक अन्न पुरवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेऊन, खराब झालेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित केल्या गेल्या.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी दरम्यान आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि औषधांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जीवनसत्त्वांचा पुरवठाही केला जात आहे.

“मध्य महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहून आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील नागरिकांचे आयुष्य पुन्हा मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.

रिलायन्स फाउंडेशनने याआधीही पंजाब, आसाम, उत्तराखंडसह इतर राज्यांतील नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. संकटाच्या वेळी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून