म.रे.च्या स्टेशन्सवर १६ ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद

मुंबई (प्रतिनिधी): दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर १६ ते २८ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लो.टि.ट., ठाणे, कल्याण, पनवेल या स्टेशन्सवर ही बंदी असणार आहे. रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुले आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाश्यांना प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले नाईल, प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवासाचे त्यानुसार नियोजन करावे असे म.रे.तर्फे सांगण्यात आले आहे.

डोंबिवली स्थानकात पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष ब्लॉक

मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात १२ मीटर रुंद पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डर लॉचिंगसाठी अप आणि डाउन जलद मार्ग तसेच ५ वा आणि ६ वा मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक १५ व १६ ऑक्टोबर च्या रात्री ००.२० ते ३.२० वाजेपर्यंत ३ तास तर डाउन आणि अप जलद मार्गावर : १.२० ते ३.२० वाजेपर्यंत तास घेतला जाईल असे म.रे. कडून सांगण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली