Naxal Leader Bhupati : महाराष्ट्र नक्षलमुक्तीच्या उंबरठ्यावर! सोनू उर्फ भूपतीसह ६१ माओवाद्यांची मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती, मुख्यमंत्र्यांनी दिली संविधानाची प्रत

गडचिरोली : महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद संपण्याच्या दिशेने आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल पडले आहे. गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) नक्षलवादी (Naxal) संघटनेच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्था मानल्या जाणाऱ्या सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरोचा सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव (Mallojula Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने तब्बल ६० सहकाऱ्यांसह एकूण ६१ जणांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या मोठ्या सामूहिक आत्मसमर्पणामुळे महाराष्ट्रातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, 'माओवादमुक्त महाराष्ट्र' हे उद्दिष्ट लवकरच साध्य होण्याची शक्यता बळावली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण आत्मसमर्पण कार्यक्रम आज गडचिरोलीत पार पडला. या सोहळ्यात, शरणागती पत्करणाऱ्या माओवाद्यांनी आपली शस्त्रे मुख्यमंत्र्यांच्या हाती सुपूर्द केली. प्रतीकात्मक स्वरूपात, माओवाद्यांच्या हातून शस्त्रे घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना भारतीय संविधानाची प्रत प्रदान केली. या कृतीतून, त्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून लोकशाही प्रक्रियेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा संदेश देण्यात आला. नक्षलवादाच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे.



५३८ निष्पाप बळीनंतर माओवादी नेता 'सोनू'चे आत्मसमर्पण


गडचिरोली जिल्ह्यात सन १९८० पासून सुरू झालेल्या सशस्त्र माओवादी चळवळीचा इतिहास अत्यंत रक्तरंजित राहिला आहे. या चार दशकांच्या हिंसक संघर्षात, माओवाद्यांनी आजवर तब्बल ५३८ सामान्य आणि निष्पाप नागरिकांचे जीव घेतले आहेत. यामुळे हा भाग नेहमीच हिंसाचार आणि दहशतीच्या छायेत राहिला आहे. परंतु, या हिंसक मार्गाला कंटाळून आता माओवादी नेतृत्वातच मोठा बदल होताना दिसत आहे. माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेला वरिष्ठ नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने स्वतःच, 'सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडून सरकारने देऊ केलेल्या शांतता वार्ता आणि पुनर्वसन योजनेद्वारे मुख्य प्रवाहात यावे,' अशी भूमिका काही महिन्यांपूर्वी मांडली होती. या भूमिकेनुसार, या महत्त्वाच्या नक्षल कमांडरसह ६० हून अधिक (एकूण ६१) सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसमर्पण केले आहे. माओवाद्यांच्या सर्वोच्च नेतृत्वातील या मोठ्या आत्मसमर्पणामुळे, महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच संपूर्णपणे हद्दपार होईल, अशी प्रबळ शक्यता निर्माण झाली असून, गडचिरोलीतील नागरिकांसाठी हे शांततेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे.





भूपतीची अट मुख्यमंत्र्यांनी पाळली! 'सोनू'चे आत्मसमर्पण हे महाराष्ट्र पोलिसांच्या 'शब्द' पालनाचे यश


माओवादी चळवळीतील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याच्या आत्मसमर्पण प्रक्रियेत महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेने निर्णायक भूमिका बजावली. भूपती तेलंगणा किंवा छत्तीसगड पोलिसांसमोर शरणागती पत्करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मध्यस्थांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले. गेले काही दिवस सुरू असलेल्या गुप्त चर्चेदरम्यान, पोलीस आणि मध्यस्थांनी भूपती आणि त्याच्या ६० हून अधिक सहकाऱ्यांवर 'सशस्त्र मार्ग सोडल्यास आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात परतल्यास शासनाकडून मिळणाऱ्या फायद्यांविषयी' यशस्वीपणे विश्वास निर्माण केला. या आत्मसमर्पणापूर्वी, भूपतीने एक महत्त्वाची अट ठेवली होती: तो केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच शरणागती पत्करेल. भूपतीचा हा विश्वास पाहून, मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ प्रतिसाद दिला. आजचे त्यांचे सर्व महत्त्वाचे कार्यक्रम बाजूला ठेवत, त्यांनी गडचिरोली येथे उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या वतीने पोलीस आणि मध्यस्थांनी भूपतीला जो शब्द दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्री गडचिरोली येथे येऊन पाळत आहेत, हे या आत्मसमर्पण सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीने, पुनर्वसन धोरणाप्रती शासनाची बांधिलकी आणि शरण आलेल्या नक्षलवाद्यांना दिलेला 'शब्द' किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त