महायुतीने केलेला विकास आणि उबाठाचा भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुद्दा

महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराची अशी ठरली रणनिती


मुंबई( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्यावतीने २२७ जागा लढून आम्ही १५० हून अधिक नगरसेवक निवडून आणले जातील असा विश्वास व्यक्त भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला.तसेच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीने मुंबईत हाती घेतलेली आणि पूर्ण केेलेली विकासकामे तसेच मागील २५ वर्षांत शिवसेनेने महापालिकेत केलेला भ्रष्ट्राचार हाच प्रचाराचा मुद्दा असेल आणि याच मुद्यावर निवडणून लढवली जाईल असे स्पष्ट संकेतच साटम यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत पत्रकारांशी अनोपचारिक चर्चा करता भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईचा वचननामा हा जनतेच्या मनातील असून त्यादृष्टीकोनातून घरोघरी जावून याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या जात आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन तरुण इंटर्नची निवड करून ५० इंटरर्नशिप दिली जाईल.तसेच बेस्ट उपक्रमाचे सुसुत्रिकरण, महाालिका शाळा आणि रुग्णालयांच्या अंतर्गत कार्यपध्दतीत सुधारणा आदी प्रमुख कामांवर महायुतीचा फोकस असेल.

मुंबईतील प्रत्येक प्रभागांमध्ये भाजपाचा नगरसेवक कुठे निवडून येईल याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत तीन कोअर कमिटीच्या बैठका झाल्या असून त्यामध्ये आलेल्या माहितीनुसार प्रभागांमधील विकासकामांवर भर दिला जात आहे. आगामी निवडणुकीकरता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटप हे ज्या पक्षाचे प्राबल्य आणि निवडून येण्याची क्षमता यावरच असेल. मागील २५ वर्षांत महापालिकेत शिवसेेनेने भ्रष्टाचारच केलेला असून या पक्षाला महापालिकेपासून लांब ठेवण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून होईल.

मागील २५ वर्षांत शिवसेनेने महापालिकेत सत्ता असताना किती प्रकल्प केले, किती योजना राबवल्या आणि पायाभूत सुविधा प्रकल्प साकारले याची माहिती द्यावी,आणि आम्ही राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईत हाती घेतले प्रकल्प आणि विकास कामे तसेच पूर्ण केलेले पायाभूत प्रकल्प यांची देतो अशा शब्दांतच साटम यांनी उबाठाला आव्हान दिले आहे.
Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील