ठाण्याच्या मेट्रोचे डिसेंबरमध्ये होणार उद्घाटन, 'या' मार्गावर धावणार मेट्रो


ठाणे : ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा डिसेंबर २०२५ मध्येच सुरू होणार आहे. उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. उद्घाटनानंतर काही तासांतच ठाणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे. मूळ योजनेनुसार ठाण्यातील मेट्रो पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांवर सेवा देणार होती. पण उद्घाटनानंतर सुरुवातीला चार स्थानकांवरच ठाणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे. लवकरच इतर स्थानकांसाठीही ठाणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे.


राज्य सरकारच्या महापारेषण कंपनीकडून वीज वाहिन्यांबाबत आवश्यक परवानगी मिळण्यात वेळ लागल्यामुळे उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यास वेळ लागला, असे एमएमआरडीएने सांगितले. सध्या एमएमआरडीए उद्घाटनाच्या तयारीत गुंतली आहे.


ठाण्याला मेट्रोद्वारे थेट मुंबईशी जोडण्यासाठी घोडबंदर रोडवरील गायमुख-कासारवडवली ते मुलुंड-घाटकोपरमार्गे वडाळा अशी मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. ही मेट्रो लाइन-4 आणि 4ए अशी ओळखली जाते. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशी दहा स्थानकांची सेवा सुरू करण्याचा आराखडा होता. पण तांत्रिक कारणांमुळे सुरुवातीला फक्त चार स्थानकांदरम्यानच मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या गायमुख ते कापूरबवाडी दरम्यान घोडबंदर रस्त्यावरून जातात. पातलीपाडा जंक्शन परिसरात या वाहिन्या मेट्रो मार्गिकेच्या वरून जात असल्याने त्या उंचीवर नेण्याचे काम आवश्यक होते. मात्र या बदलासाठी परवानगी आणि तांत्रिक प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे संपूर्ण मार्गिकेचे काम अडचणीत आले. यामुळे पूर्ण दहा स्थानके एकाच वेळी सुरू करणे शक्य झाले नाही.


पूर्णपणे तयार असलेल्या चार स्थानकांदरम्यानच मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही चार स्थानके कोणती असतील याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.


Comments
Add Comment

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे मेहुणे झाले हरियाणाचे पोलीस महासंचालक

चंदिगड : आयपीएस अधिकारी वाय. पूरण सिंग यांच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुघ्न कपूर यांना

Gadchiroli : ब्रेकिंग! गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सरकारला मोठं यश

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील

Maharashtra Goverment : महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा! मालमत्ता अन् कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना; महाराष्ट्राचे कर्ज व्यवस्थापन सुधारणार का?

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्याच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देण्यासाठी आणि मालमत्ता व्यवस्थापन अधिक

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने