मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे मुंबई शहर आणि उपनगरमधील कोणत्याही मुद्रांक शुल्क कार्यालयात क्षेत्रीय मर्यादेची अट न ठेवता दस्त नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे 'वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन' या धोरणाकडे आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे.


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून, त्या संदर्भातील राजपत्र देखील जारी करण्यात आले आहे.


नवीन निर्णयामुळे काय बदलणार?


पूर्वी मुंबईत दस्तऐवज नोंदणी करण्यासाठी नागरिक ज्या भागात राहत होते किंवा ज्या भागात मालमत्ता होती, त्याच क्षेत्रातील विशिष्ट मुद्रांक कार्यालयात जाणे बंधनकारक होते. आता ही अट रद्द करण्यात आली आहे.


मुंबईतील 'या' सहा कार्यालयात नोंदणी सुविधा


मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक आता खालील सहा प्रमुख मुद्रांक कार्यालयांत आपला मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र तसेच अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील


बोरिवली


कुर्ला


अंधेरी


मुंबई शहर (Mumbai City)


प्रधान मुद्रांक कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस (Collector of Stamps Enforcement I)


प्रधान मुद्रांक कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस (Collector of Stamps Enforcement II)


हा निर्णय मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा असून, महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


महसूल विभागाचा आणखी एक मोठा निर्णय


यासोबतच महसूल विभागाने जमीन मोजणी संदर्भातही एक मोठा निर्णय घेतला आहे. जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर खासगी परवानाधारक भूमापकांच्या मदतीने हे काम केवळ ३० दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्वी यासाठी ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागायचा.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता