बांगलादेशातील कापड कारखान्यात भीषण आग, ९ जणांचा मृत्यू


ढाका : बांगलादेशमधील एक कपडा कारखाना आणि केमिकल गोदामात भीषण आग लागली. ही घटना मीरपूरच्या रूपनगर भागातील आहे. या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केमिकल गोदाम रेडीमेड गारमेंट कारखान्यालाच लागून होतं. हा कारखाना मजली आहे आणि आग चौथ्या मजल्यावर लागली होती.


अग्निशमन सेवा आणि नागरिक सुरक्षा विभागाच्या मीडिया शाखेचे अधिकारी तल्हा बिन जसीम यांनी सांगितले की, त्यांना स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:40 वाजता आगीची माहिती मिळाली आणि अग्निशमनची पहिली टीम सकाळी 11:56 वाजता घटनास्थळी पोहोचली.


जसीम यांनी सांगितले की, केमिकल गोदामात ब्लीचिंग पावडर, प्लास्टिक साहित्य आणि हायड्रोजन पेरॉक्साइड साठवलेले होते. त्यांनी सांगितले की, या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतकी भयानक होती की अद्यापही ती पूर्णतः विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे आणि झालेल्या नुकसानाचे मूल्यमापन करण्याचे काम सुरू आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, कपडा कारखान्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून 9 मृतदेह सापडले आहेत. अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे की, सर्व मृत्यू विषारी वायूमुळे झाले असावेत. अद्यापही कारखान्याच्या आत शोधमोहीम चालू आहे.


Comments
Add Comment

Bangladesh : हादीच्या हत्येवरून भारत-बांगलादेशात 'राजनैतिक' ठिणगी; बांगलादेशच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर

ढाका : बांगलादेशातील २०२४ च्या ऐतिहासिक विद्यार्थी उठावाचे नेतृत्व करणारे आणि 'इंकलाब मंच'चे प्रवक्ते शरीफ

Bangladesh Journalist Targeted : २८ पत्रकार, ९ वा मजला अन् गच्चीवर मृत्यूचं तांडव! दंगलखोर दरवाजा ठोकत होते, 'द डेली स्टार'मधील थरार...

ढाका : बांगलादेशातील विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराने आता अत्यंत

Osman Hadi : हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून ओढून आणा, अन्यथा देश ठप्प करू!" इंकलाब मंचाची धमकी, भारत-बांगलादेश संबंधांमध्ये पुन्हा तणावाचे सावट?

ढाका : बांगलादेशातील सत्तापालटाचा चेहरा आणि विद्यार्थी चळवळीचा अग्रगण्य नेता शरीफ उस्मान हादी याची

बांगलादेशात हिंसाचार उफाळला! इन्कलाब मंचचे प्रवक्ते हादी यांच्या मृत्यूमुळे देशाला दंगलीचे स्वरूप

बांगलादेश: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करणाऱ्या युवा चळवळीतील प्रमुख नेत्याच्या मृत्यूनंतर

पाकिस्तानातही 'धुरंधर'ची भुरळ! गेल्या २० वर्षांत सर्वाधिक पायरेटेड करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा

कराची: अक्षय खन्ना, रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि सौम्या टंडन अशा तगड्या कलाकारांची फळी असलेला

सौदी अरेबियाने हाकलून दिले ५६ हजार पाकिस्तानी भिकारी

रियाध : तेलाच्या विहिरी तसेच मक्का आणि मदिना यामुळे इस्लाम धर्मियांमध्ये प्रचंड महत्त्व