गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे गोकुळधामसह आसपासच्या अनेक छोट्या आणि मोठ्या इमारतींसह सोसायट्यांमध्ये या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे येथील इमारती आणि टॉवरना टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या समस्येबाबत स्थानिक माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी थेट जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांची भेट घेतल्यानंतर पी दक्षिण विभागातील जल खात्यातील अधिकाऱ्यांची आता एकच धावपळ सुरु झाली आहे.


गोरेगाव पूर्व मधील गोकुळधाम परिसरासह एम एस एस सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, ऑबेरॉय वूड्स, डिबी वूड्स, लक्षचंडी, अमृतवन, बंगाली कंपाऊंड, नवभारत तसेच दूधसागर आदी सोसायटींमध्ये मागील काही दिवसांपासून कमी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक अपुऱ्या पाण्याअभावी त्रस्त आहेत. याबाबत नागरिकांनी स्थानिक माजी भाजपा नगरसेविका प्रीती सातम यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी तातडीने जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जलअभियंता यांनी पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त जलकामे यांना निर्देश दिल्यानंतर विभागातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.


विभागातील अनेक छोट्या आणि मोठ्या सोसायट्यांमधून पाणी समस्येच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रथम गळतीमुळे हा प्रकार सुरु असेल असे वाटले होते, पण अधिक शोध घेतला असता मालाड जलाशयातून जिथे पूर्वी १० पाऊंडच्या दाबाने पुरवठा व्हायचा तो आता ०७पाऊंडने केला जात असल्याचे समजले. त्यामुळे मालाड जलाशयातील पाण्याची पातळी समपातळीत नसल्याने या भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे ही बाब जलअभियंता यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार आता प्रत्यक्षात पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी पाणी पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास आहे. - प्रीती सातम, भाजपा,माजी नगरसेविका

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण