भारत पाकिस्तानचे ज्युनिअर हॉकीपटू आले आमनेसामने आणि घडली 'ही' घटना


मलेशिया : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली. यानंतर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत तीन वेळा भारत आणि पाकिस्तानचे पुरुष क्रिकेट संघ तसेच आयसीसी महिला विश्वचषकात एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले. या चार वेळा खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करणे टाळले. यामुळे मलेशियात सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेत भारत पाकिस्तानचे खेळाडू काय करणार याविषयी अनेकांना उत्सुकता होती. हॉकीपटूंनी त्यांच्या पातळीवर हा प्रश्न अनोख्या पद्धतीने सोडवला.


भारत पाकिस्तानच्या ज्युनिअर हॉकीपटूंनी एकमेकांना हस्तांदोलन करण्याऐवजी हाय फाय केले, अर्थात दुरुन हात दाखवत अभिवादन केले. यानंतर हॉकीचा सामना सुरू झाला. दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाने एकमेकांच्या खेळाडूंना सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज दिला होता तसेच हस्तांदोलन झाले नाही तरी एकमेकांविषयी राग बाळगण्याऐवजी खेळात उत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला होता. खेळाडूंनी हुशारी केली. हाय फाय करत आधुनिक पद्धतीने अभिवादन केले.


याआधी ऑगस्ट महिन्यात बिहारमधील राजगीर येथे पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धा झाली. या स्पर्धेवेळी पाकिस्तानने भारतात त्यांचा हॉकी संघ पाठवणे टाळले होते. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची तयारी दाखवली पण संपूर्ण स्पर्धेत एकमेकांचा पराभव करण्यासाठी चांगली कामगिरी करण्यावर भर दिला.


Comments
Add Comment

मोहम्मद शमीची निवड न झाल्याने निराशा, निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

नवी दिल्ली: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि

"हे लज्जास्पद आहे" : गौतम गंभीरने हर्षित राणाच्या टीकेवर फटकारलं

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या निवडीवर सध्या

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या