डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोल्ड्रिफ कफ सिरप निर्मात्या श्रीसन फार्मा कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कंपनीसाठी कार्यरत असलेल्या डॉ. प्रवीण सोनी यांच्या विरोधात मध्य प्रदेशमधील छिंदवाडाच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी डॉक्टरांवर लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केल्याचा गंभीर आरोप केला. सुनावणीअंती सत्र न्यायालयाने डॉ. प्रवीण सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला.


औषधात लहानग्यांना अपायकारक असे रसायन मिसळले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाला याची माहिती होती. डॉक्टरांनाही सर्व माहिती होते. पण व्यवस्थापनाकडून मोठी रक्कम घेऊन डॉ. प्रवीण सोनी यांनी तोंड बंद ठेवले. खोकला झालेल्या अनेक मुलांना कोल्ड्रिफ कफ सिरप लिहून दिले, असा आरोप छिंदवाडाच्या सत्र न्यायालयात पोलिसांनी केला. किती मुलांना कोल्ड्रिफ लिहून दिल्यास किती पैसे मिळणार याबाबत डॉ. सोनी आणि कंपनीचे व्यवस्थापन यांच्यात व्यवहार ठरला होता. प्रत्येक कफ सिरपच्या बाटलीमागे डॉक्टरांना दहा टक्के कमिशन निश्चित होते, असाही आरोप पोलिसांनी केला.


न्यायालयात सादर अहवालानुसार, डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसने सर्व राज्यांसाठी औषधांसंदर्भात मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये चार वर्षांच्या खालील मुलांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात FDC दिले जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे मुलांना लघवीस न होणे आणि किडनी खराब होणे अशा व्याधी होत असल्याचे माहिती असूनही सोनी यांनी कोल्ड्रिफचे डोस मुलांना लिहून दिले. डॉ. सोनी यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप न्यायालयासमोर फेटाळून लावले आहेत. पण सुनावणीअंती सत्र न्यायालयाने डॉ. प्रवीण सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी