व्हीव्हीपॅटवरून रणकंदन! कोण खेळतंय रडीचा डाव?

बॅलेट पेपरची मागणी ते व्हीव्हीपॅटचा हट्ट: 'महाकन्फ्यूज आघाडी' गोंधळलेली


मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आयोगाच्या कारभारावर त्यांनी गंभीर आक्षेप घेतले. विरोधकांनी सवाल केला आहे की, जी निवडणूक २०२२ मध्ये व्हायला हवी होती, ती आता २०२६ मध्ये होतेय. या चार वर्षांत आयोगाने कोणती तयारी केली? हजारो कोटी रुपये खर्च करून मागवलेले व्हीव्हीपॅट नेमके कुठे आहेत? सामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही, आणि व्हीव्हीपॅट हेच त्यांच्या विश्वासाचं एकमेव माध्यम आहे. त्यामुळे, व्हीव्हीपॅटचा वापर अनिवार्य असावा, ही त्यांची ठाम मागणी आहे.


तसेच आयोगाने जर व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन्स दिली नाहीत, तर मग मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका थेट बॅलेट पेपरवरच घ्याव्यात, अशी रोखठोक मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली आहे.


दरम्यान, इकडे विरोधकांनी आयोगाला धारेवर धरलं, तर तिकडे महायुतीमधील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर पलटवार केला. शिंदे यांनी विरोधकांच्या या कृतीला थेट 'रडीचा डाव' असं संबोधलं आहे. शिंदेंनी स्पष्ट म्हटलंय की, ही महाविकास आघाडी नाही, तर 'महाकन्फ्यूज' आघाडी आहे. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. विधानसभेत महायुतीच्या जोरदार यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपला पराभव निश्चित दिसू लागल्याने हे व्हीव्हीपॅटचे नाटक सुरू आहे.


शेतकऱ्यांसाठी केलेली भरीव मदत आणि विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा ठाम दावाही एकनाथ शिंदेंनी केला. शिंदेंनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत, त्यांचा राजकीय स्वार्थ उघड केला. ते म्हणाले, जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळतो, तेव्हा आयोग बरोबर असतो; पण पराभव दिसू लागला की, ते निवडणूक आयोग आणि न्यायालयांवरही आरोप करतात. पूर्वी हेच लोक ईव्हीएम मशिन्सविरोधात होते, निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या म्हणत होते, आणि आता व्हीव्हीपॅटची सुविधा असलेल्या ईव्हीएम मशिन्ससाठी हट्ट धरत आहेत. हा विरोधाभास जनतेला स्पष्ट दिसतोय. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या या गोंधळलेल्या भूमिकेचा अर्थ जनता नक्कीच ओळखेल आणि येत्या निवडणुकांमध्ये महायुती सरकारला पाठिंबा देऊन प्रचंड विजय मिळवून देईल, असा ठाम विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस