व्हीव्हीपॅटवरून रणकंदन! कोण खेळतंय रडीचा डाव?

बॅलेट पेपरची मागणी ते व्हीव्हीपॅटचा हट्ट: 'महाकन्फ्यूज आघाडी' गोंधळलेली


मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आयोगाच्या कारभारावर त्यांनी गंभीर आक्षेप घेतले. विरोधकांनी सवाल केला आहे की, जी निवडणूक २०२२ मध्ये व्हायला हवी होती, ती आता २०२६ मध्ये होतेय. या चार वर्षांत आयोगाने कोणती तयारी केली? हजारो कोटी रुपये खर्च करून मागवलेले व्हीव्हीपॅट नेमके कुठे आहेत? सामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही, आणि व्हीव्हीपॅट हेच त्यांच्या विश्वासाचं एकमेव माध्यम आहे. त्यामुळे, व्हीव्हीपॅटचा वापर अनिवार्य असावा, ही त्यांची ठाम मागणी आहे.


तसेच आयोगाने जर व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन्स दिली नाहीत, तर मग मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका थेट बॅलेट पेपरवरच घ्याव्यात, अशी रोखठोक मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली आहे.


दरम्यान, इकडे विरोधकांनी आयोगाला धारेवर धरलं, तर तिकडे महायुतीमधील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर पलटवार केला. शिंदे यांनी विरोधकांच्या या कृतीला थेट 'रडीचा डाव' असं संबोधलं आहे. शिंदेंनी स्पष्ट म्हटलंय की, ही महाविकास आघाडी नाही, तर 'महाकन्फ्यूज' आघाडी आहे. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. विधानसभेत महायुतीच्या जोरदार यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपला पराभव निश्चित दिसू लागल्याने हे व्हीव्हीपॅटचे नाटक सुरू आहे.


शेतकऱ्यांसाठी केलेली भरीव मदत आणि विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा ठाम दावाही एकनाथ शिंदेंनी केला. शिंदेंनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत, त्यांचा राजकीय स्वार्थ उघड केला. ते म्हणाले, जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळतो, तेव्हा आयोग बरोबर असतो; पण पराभव दिसू लागला की, ते निवडणूक आयोग आणि न्यायालयांवरही आरोप करतात. पूर्वी हेच लोक ईव्हीएम मशिन्सविरोधात होते, निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या म्हणत होते, आणि आता व्हीव्हीपॅटची सुविधा असलेल्या ईव्हीएम मशिन्ससाठी हट्ट धरत आहेत. हा विरोधाभास जनतेला स्पष्ट दिसतोय. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या या गोंधळलेल्या भूमिकेचा अर्थ जनता नक्कीच ओळखेल आणि येत्या निवडणुकांमध्ये महायुती सरकारला पाठिंबा देऊन प्रचंड विजय मिळवून देईल, असा ठाम विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक सेतूची उभारणी कारावाज्‍जो, रावबहादूर महादेव विश्‍वनाथ धुरंधर यांच्या चित्रप्रदर्शनातून

मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

सागरी विकासाची नवी दिशा! ‘इंडिया मेरीटाईम वीक’मुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता