
गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविण्यासाठी खान अॅकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
राज्यातील सरकारी शाळेत जागतिक दर्जाचे शिक्षण राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण असून, सुमारे ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविला जात असून या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील सुमारे ६२ हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अॅकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल.