चीनच्या सीमेसंदर्भात नेहमीच आम्ही दक्ष : लष्करप्रमुख अनिल चौहान

उत्तराखंडची सीमा जरी सध्या शांत असली, तरी चीनच्या सीमेसंदर्भात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे", असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी देहरादूनमध्ये आयोजित रॅलीमध्ये सांगितले.


उत्तराखंड राज्याची चीनसोबत सुमारे ३५० किलोमीटर आणि नेपाळसोबत २७५ किलोमीटर लांब सीमा आहे. त्यामुळे हे राज्य सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि रणनीतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यावेळी चौहान म्हणाले की, भारत आणि चीनमधील काही सीमावर्ती भागांबाबत अजूनही मतभेद आहेत आणि उत्तराखंडमधील बाड़ाहोती परिसरात पूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सीमांची निगराणी आणि सतर्कतेबाबत कधीही हलगर्जीपणा होऊ नये.चौहान म्हणाले की, उत्तराखंडचा इतिहास अत्यंत गौरवशाली राहिलेला आहे.


येथील नागरिकांनी देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सदैव योगदान दिलं आहे. चौहान यांनी सीमावर्ती भागांतील नागरिकांना देशाच्या सुरक्षेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितलं की, सीमेची सुरक्षा ही केवळ सैन्याची जबाबदारी नाही, तर स्थानिक नागरिकांची सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे.
सीमावर्ती भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विशेषतः माजी सैनिकांना "डोळे" असे संबोधित करत त्यांनी म्हटले की, "जर हे लोक सतर्क राहिले, तर आपली सीमा अधिक मजबूत होईल. " जनरल चौहान यांनी सांगितले की, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये ज्या प्रकारे सहकारी संस्थांमार्फत सैन्याला अन्नधान्य पुरवलं जाते, तशीच एक व्यवस्था आता उत्तराखंडमध्येही लागू करण्यात येईल.


सध्या सहकारी समित्यांकडून दुग्धव्यवसाय व पशुपालनाशी संबंधित उत्पादने खरेदी केली जात आहेत आणि भविष्यात त्यांच्याकडून ताजं रेशनही खरेदी केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे सीमावर्ती भागांमध्ये अन्न व इतर वस्तूंचा नियमित आणि सुलभ पुरवठा सुनिश्चित होईल. स्थानिक लोकांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. अशा प्रकारे, सैन्य आणि स्थानिक समाज यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत होईल, आणि सीमावर्ती भागांचा सर्वांगीण विकास घडवून आणता येईल, असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात