महायुतीला घवघवीत यश मिळणार : मुख्यमंत्री

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात; मुंबई विभागाचा आढावा बाकी


मुंबई: राज्यात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) कंबर कसली आहे. याच अनुषंगाने, भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून, आढावा बैठकांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना आणि दिशा-निर्देश दिले आहेत.



महायुतीच्या यशाचा विश्वास आणि 'नो टीका'चे आदेश


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी युतीच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले. "युती झालीच पाहिजे, अशा आमच्या सूचना आहेत," असे ते म्हणाले. मात्र, जर काही कारणास्तव युती झाली नाही, तरी कोणत्याही परिस्थितीत मित्र पक्षांवर कोणीही टीका करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.



विभागीय आढावा अंतिम टप्प्यात


या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागांच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही संपूर्ण राज्यात दौरे लावले आहेत. पुढील आठवड्यात मुंबई विभागाचा आढावा घेऊन भाजपची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांची मानसिकता निवडणुकीसाठी चांगली आहे आणि पक्ष पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती त्यांनी दिली.



बोगस मतदानावर लक्ष आणि संघावरील वक्तव्य


शिक्षक मतदार संघातील बोगस मतदानासंदर्भात पक्षाकडे आलेल्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. "येत्या निवडणुकांमध्ये बोगस मतदान होणार नाही याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. खोटे मत नोंदवून कुणालाही निवडणूक लढता येणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.


यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याच्या पूर्वीच्या प्रयत्नांवरही भाष्य केले. "ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते," याची आठवण करून देत ते म्हणाले की, "संघ ही एक सांस्कृतिक शक्ती आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन मानव निर्मितीचे कार्य संघ करत असतो. प्रसिद्धीसाठी येणाऱ्या पत्रांकडे आम्ही लक्ष देत नाही," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


 
Comments
Add Comment

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.